अकोट(देवानंद खिरकर) – आकोट तहसिल कार्यालयाच्या महसुल अभिलेख कक्षाच्या पाठीमागील खुल्या जागेत झुडपे व कच-याला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ ऊडाला. तहसिल कर्मचा-यांनी वेळेवर धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळविल्याने होणारा मोठा अनर्थ थोडक्याने टळला आहे.दुपारी दोन ते तिन वाजताची वेळ. तहसिल कर्मचा-यांचा हा लंच टाईम. त्याने सारे तहसिल कर्मचारी भोजनासाठी आपआपल्या आवडीच्या ठिकाणी जावू लागले. ईतक्यात अचानक तहसिल कार्यालयाच्या महसुल अभिलेख कक्षाच्या मागून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसु लागल्या. अभिलेख कक्षाचे प्रभारी तथा महसुल सहाय्यक गोविंद कराळे, त्यांचा मदतनिस अर्जुन भास्कर व कोतवाल रामदास अंभोरे यानी तिकडे धाव घेतली. तिथे त्याना आग लागलेली दिसली. आगीची ओरड होताच एकच गोंधळ ऊडाला.महत्वाचे म्हणजे महसुल अभिलेख आणि पुरवठा विभाग या लगतच आग लागली होती. कर्मचा-यानी ताबडतोब खिडक्या आतुन बंद केल्या. बाहेरुन गोविंद कराळे, अर्जुन भास्कर आणि रामदास अंभोरे यानी बाजुच्या ऊपहार गृहातुन पाणी आणून व झाडांच्या डहाळ्यांचा वापर करुन आग नियंत्रणात आणली. यात धक्कादायक म्हणजे तहसिल कार्यालयात तिन दिवसांपासुन पाणी भरलेले नाही. ईथे कायमस्वरुपी नळ नाहीत. आग विझविण्याचे बंब नाहीत. ह्या आगीने ह्या असुविधा फारच प्रकर्षाने अधोरेखित झाल्या. वेळेवर ही आग लक्षात आल्याने नियंत्रणात आणता आली.परंतु हीच आग सुटीचे दिवशी अथवा रात्रीत लागली असती तर मोठा गहजब झाला असता. त्यामूळे या ठिकाणीआनेक बाबींची पुर्तता करणे अनिवार्य आहे. परंतु नूतन महसुल भवनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामूळे या ठिकाणी ह्या सुविधा पुरविणे शक्य आहे काय हा प्रश्न आहे. परंतु हे शक्य नसल्यास नविन आणि सुरक्षित ईमारतीमध्ये तहसिल कार्यालयाचे स्थानांतरण करणे काळाची गरज आहे.