बोर्डी(देवानंद खिरकर)- बोर्डी गावातील भगवान रिंगणे यांच्या घरापासून ते अनिल ताडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे भूमिपूजन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोर्डी गावचे माजी सरपंच सुभाष खिरकर तर प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य निखिल गावंडे,गजानन बोरकर,राम पाटील मंगळे सरपंच बेलुरा,विशाल भगत,सह आदी प्रहारचे पदाधिकारी तसेच बोर्डीतील समाधान चंदन,अरुण भगत,रमेश राऊत,साजिद शेख,कपिल रजाने, गजानन डवंगे,तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब ताडे,आदी मंडळी मंचकावर उपस्थित होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल भालतिलक यांनी केले. तर आपल्या मनोगतात अनिल गावंडे यांनी बोर्डी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील व श्री नागास्वामी संस्थान ते आठवडी बाजार या रस्त्याच्या विकासासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत विशेष बैठक घेऊन लवकरात लवकर हा रस्ता मार्गी लावू असे आश्वासन दिले.
तसेच भूमिपूजन झालेला 25 लक्ष रुपयाचा रस्ता पालक मंत्री बच्चु कडू यांच्या वतीने मनेरगा मार्फत करण्यात येत आहे.तसेचजिल्हा परिषद सदस्य निखिल गावंडे,सुभाष खिरकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन राजेश खिरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनिल खिरकर,विनोद पाटील गये, अनिल आतकड,गजानन आम्ले, विष्णू पखाले,गोपाल सासोटे,पिंटू सोनोने,रमेश रिंगने,अर्जुन भगत, विठ्ठल लाहोरे,संतोष लाहोरे, तुळशीदास वाघमारे,निलेश कवळे योगेश कडू,चेतन गुरेकार,महादेव गावंडे,सुभाष बुले,अवि चेडे,दिनेश घोडकी,सुरेश रिंगणे,अनिल राऊत, बंडु देशमुख,दादाराव तळोकार, दुर्योधन आम्ले,अमोल तळोकार, अक्षय भगत यांच्या सह गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.