अकोट(देवानंद खिरकर)-: मागील ४ वर्षांपासून पासून अकोट अकोला रोड व देवरी शेगांव रोडचे भिजंते घोघंडे कायम असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी पणा व वनविभागाच्या आडकाठी वनकायद्यामूळे आता पर्यत ५ निष्पाप नागरीकाना आपले जिव गमवावे लागत आहेत. या मार्गावरचा अडथळा दूर करण्यासाठी आणखी किती निष्पाप जीवाचे बळी द्यावे लागणार असा प्रश्न सामान्य नागरीका समोर उभा राहिला आहे. शेगांव येथे दर्शन करीता जात असलेल्या परतवाडा येथील आकाश अवधूत कूकडे, अंकूश प्रल्हादराव दिवटे, एकलासपूर अक्षय अवघड, घनशाम बंडूजी चवरे अमळनेर यांचा कार क्रमांक एम एच ए आर 9796 अक्षरशा चेंदामेंदा होऊन ४ जण जागीच ठार झाल्याने सर्वीकडे हळहळ व्यक्त होत. असून संबधीत वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग बदल सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना एक निवेदन देण्यात आले घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकाऱ्यांनी वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्याची तातडीची मिटींग घेवून तात्काळ काम सुरू करण्याबाबत चर्चा केली व तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतकाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गजानन पुंडकर, राजुभाऊ नागमते, प्रशांत पाचडे, केशव बिलेबिले, तुषार पाचकोर, निखील गावंडे, तुषार अढाऊ, एडवोकेट श्रीरंग तट्टे, नीलेश नवघरे, राजेश गावंडे,अमोल पालेकर, सारंग कराळे, गोलू भगत, ज्ञानेश्वर दहिभात राहुल आचल बेलसरे, डाॅक्टर गजानन महल्ले, सुनील गावंडे, संजय शेळके, शैलेश इंगोले, राहुल नकवाल, गिरीश पांडे दिपक किचबरे दीपक ठोंबरे, सुनील कराळे, मोठ्या प्रमाणात अकोट ब्रेकिंग ग्रुप व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
भीषण अपघात निष्पाप नागरिकाना जिव गमवावे लागत असून या मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याकरीता व या मार्गाचे कामात दिरंगाई अडथळा निर्माण करत असलेल्या संबधित अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गून्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय पत्रकार मित्र सघंटन (ए जे एफ सी) व तीने करण्यात आली. यावेळी राहुल कुलट सारंग कराळे अक्षय जायले गणेश बोरचाटे देवानंद खिरकर दिनेश बोचे संजय गवळी चचंल पितांबरवाले धिरज बेलसरे उपस्थित होते.