• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 18, 2022
36 °c
Akola
36 ° Sat
36 ° Sun
36 ° Mon
35 ° Tue
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’; मोदींच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे, असं मत देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Our Media by Our Media
November 19, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
0
narendra modi
32
SHARES
703
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला होता, असं मोदी यांनी सांगितलं.

हेही वाचा

महिला पोलिसाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, बीएसएफ जवानाला अटक

देशभरात एप्रिलमध्ये 88 लाख नोकर्‍या; रोजगार निर्मिती कमीच

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच आता सरकारला उपरती झाली. हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने आजही सुरूच आहेत. सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याचे यात नाहक बळी गेले. पण अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना त्रिवार वंदन. या आंदोलनात प्राणास मुकलेल्या वीरांना नम्र अभिवादन उद्धव ठाकरे यांनी केलं. तसेच केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन देशहिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे, असं मत देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Tags: cm Uddhav ThackerayfarmersmharashtraMumbaiNarendra Modi
Previous Post

आम्हालाही निलंबित करा तेल्हारा आगारातील ५३ एसटी कामगारांचे निवेदन

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन; राष्ट्रीय एकात्मता शपथ

RelatedPosts

facebook-2
Featured

महिला पोलिसाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, बीएसएफ जवानाला अटक

May 17, 2022
नोकर्‍या;
Featured

देशभरात एप्रिलमध्ये 88 लाख नोकर्‍या; रोजगार निर्मिती कमीच

May 17, 2022
fdfffsfsfsfs
Featured

शालेय पोषण आहारात मधाचा समावेश करणार : सुभाष देसाई

May 17, 2022
rain-2 (1)
Featured

मान्सून आज अंदमानात दाखल; दक्षिण भारतात अतिवृष्टी

May 16, 2022
akola news
Featured

नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचा दौरा जाहीर

May 14, 2022
ramayana-yatra
Featured

18 दिवसांची ‘रामायण यात्रा’ 21 जूनपासून

May 13, 2022
Next Post
Smt Idira Gandhi Abhivadan

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन; राष्ट्रीय एकात्मता शपथ

TET

शिक्षक पात्रता परीक्षा; परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश

Stay Connected

  • 319 Followers
  • 284 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

संभाजीराजे छत्रपती

अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार; संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

May 12, 2022
Bharat Chavan

लोक सहभागातुन नदीचे खोलीकरण करणे आवश्यक,भारत चव्हाण गटविकास अधिकारी

May 14, 2022
maxresdefault

उद्यमिता यात्रा शुक्रवारी (दि.20) अकोल्यात; तीन दिवस उद्योजकता कार्यशाळा

May 18, 2022
रोजगार नोंदणी मेळावा: नोंदणीतून प्राप्त माहितीचे योग्य पृथ्थकरण करा- पालकमंत्री बच्चू कडू

रोजगार नोंदणी मेळावा: नोंदणीतून प्राप्त माहितीचे योग्य पृथ्थकरण करा- पालकमंत्री बच्चू कडू

May 16, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks