अकोला : मागील एक दोन महिने अगोदर अतिशय मुसळधार पाऊस होऊन महापूर आला होता या महापुरा मध्ये बऱ्याच लोकांचे घर पडली घरातील सामान वाहून गेले काही लोकांचे जीव गेलेत बऱ्याच लोकांचे नुकसान झाले. त्याच बरोबर मोर्णा नदीवरील मुख्य रस्त्यावरील शहराला जोडणारा पुलाचा भराव खचला आहे. सदर पुल अत्यंत धोकादायक झाला असून पुलाचा भराव खचला त्या खचलेल्या भागासमोर महानगरपालिका प्रशासनाने माती टाकून घेरून घेतला आहे.
यामुळे वाहतुकीस खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे. ज्या साईडला पुलाचा भराव खचला त्या साईडला माती टाकून घेऊन घेतला त्याचप्रमाणे पुलाच्या दुसऱ्या साईड कडून पण माती टाकून तो भाग पण घेऊन घेतला. त्यामुळे लोकांना वाहतुकीसाठी खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे. झोपी गेलेले महानगरपालिका प्रशासन याकडे कधी लक्ष देईल पुलाचा खचलेला भाग कधी दुरुस्त करेल पुलाच्या दुरुस्तीचा मुहूर्त कधी काढेल असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे महानगरपालिका आयुक्त यांना केला आहे.