• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, September 13, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Uddhav Thackeray : ‘ठाकरी गुगली’ने राजकीय गोंधळ! युतीचे संकेत की…

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
152 3
0
chief-minister-uddhav-thackeray
23
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

औरंगाबाद/मुंबई: व्यासपीठावर उपस्थित असलेले आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी… असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी औरंगाबादेतील कार्यक्रमात केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आजी-माजी आणि भावी, असा एकच गोंधळ उडाला.

मुख्यमंत्र्यांचे विधान एक आणि अर्थ मात्र अनेक काढले जाऊ लागले. मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबत युती होण्याचे संकेत दिले आणि महाराष्ट्रात सत्तांतरच होऊ घातले आहे, असा एक अर्थ. सतत त्रास देणार्‍या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला केवळ इशारा म्हणून मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हणून संबोधले, असा दुसरा अर्थ.

हेही वाचा

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

या दोन अर्थांनी राजकारणात एकाचवेळी पुरता गोंधळ उडवला असतानाच, चंद्रकांत पाटील यांच्या पक्षांतराची पुडीही खुद्द मुख्यमंत्र्यांनी सोडून दिली आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर चंद्रकांत पाटील यांचा सेना प्रवेशही निश्चित करून टाकला. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नेमके काय होऊ घातले आहे, याचा अंदाज लागण्यापूर्वीच भाजपसोबत युती होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनीच फेटाळून लावली. युती होणार का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी काळावर सोपवले आणि उडवलेला गोंधळ कायम ठेवला.

शुक्रवारी हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) औरंगाबाद दौर्‍यावर होते. तब्बल 26 वर्षे रखडलेल्या संतपीठाचे ऑनलाईन उद्घाटन त्यांनी केले आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या भूमिपूजनाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे या भाजप नेत्यांचीही उपस्थिती होती.

भावी सहकारी म्हणजे काय? ठाकरेंनी सांगितला अर्थ

भूमिपूजनाच्या भाषणात भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून युतीची चर्चा घडवल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र नंतर राजकीय अंदाजाचे विमान सरळ खाली उतरवले. भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधले याचा अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी काळावर सोपवले. उद्धव म्हणाले, सर्व काही काळच ठरवेल. अलीकडे राजकारणाला अतिशय विकृत स्वरूप येताना दिसत आहे. हे प्रकार थांबले पाहिजेत. राजकीय विसंवादाचा परिणाम विकासकामांवर होतो. त्यामुळेच आपण ‘आजी-माजी सहकारी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी,’ असा उल्लेख केला.

असे म्हणण्यामागचे कारण एवढेच की, विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. केंद्रात भाजपची सत्ता आणि राज्यात महाविकास आघाडीची. त्यामुळे दोघेही सोबत राहिलो, तर विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण होण्यास मदत होईल, या अर्थानेच हे वक्तव्य केल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

युती होईल अशी परिस्थिती नाही : फडणवीस

राजकारणात काहीही होऊ शकते; पण आताच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येतील, अशी परिस्थिती दिसत नाही. ही अनैसर्गिक आघाडी फार दिवस टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात दिली.

आपण कशा लोकांबरोबर अनैसर्गिक युती केली आणि काय काम करत आहोत, हे ध्यानात आल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य केले असावे, असेही फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा व समर्पण साप्ताहा’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये भाजपच्या नेत्यांचा उल्लेख ‘भावी सहकारी’ असा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावर युतीची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली.

अनैसर्गिक आघाडीतून बनलेले हे सरकार टिकू शकणार नाही…

राजकारणात काहीही होऊ शकते; पण मला आज तशी कोणतीच शक्यता दिसत नाही. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. सरकार बनलेच पाहिजे, असा काही अट्टाहास नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे काम करत आहोत, असे सांगून फडणवीस म्हणाले, अनैसर्गिक आघाडीतून बनलेले हे सरकार फार काळ टिकू शकणार नाही. कामे नीट मार्गी लागत नाहीत, भ्रष्टाचार बोकाळला आहे, हे ध्यानात आल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले असावे.

Tags: Uddhav Thackeray
Previous Post

‘शेतकरी नवरा नको’ला शेतकरीपुत्राचे उत्तर! पंचक्रोशीत कौतुक

Next Post

जास्त व्याजदराचे आमिष देऊन ॲपद्वारे पाच लाखांची रक्कम उकळली

RelatedPosts

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Featured

जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी वर्षा मीना

August 29, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची विनामुल्य सुवर्णसंधी

August 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
Featured

जात पडताळणीचे कार्यालय आता सामाजिक न्यायभवनात

August 22, 2025
शांघाय येथे पुढील वर्षी आयोजन तरूणांना जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी
Featured

शांघाय येथे पुढील वर्षी आयोजन तरूणांना जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी

August 22, 2025
Next Post
सायबर गुन्ह्या

जास्त व्याजदराचे आमिष देऊन ॲपद्वारे पाच लाखांची रक्कम उकळली

Voter Id

घरी बसून मतदार ओळखपत्र ऑनलाईन करु शकता, घरपोच मिळेल; असा करा अर्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.