पातुर (सुनिल गाडगे ): येथील नामांकीत अशा तुळसाबाई कावल विद्यालयाने आज पर्यंत अनेक यशस्वी विद्यार्थी दर्जेदार शिक्षण देवून घडविले आहेत. त्यामध्ये मोठ मोठे प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती, डॉक्टर, इंजिनीअर्स, राजकीय नेते, संस्था चालक, व्यावसायीक, प्रगतशील शेतकरी यांचा समावेश आहे.
१९८७ ची अशीच एक विद्यार्थ्यांची एक तुकडी तब्बल ३३ वर्षांनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्नेह मिलनाने एकत्र आली.
दिड वर्षांपासून शालेय तुकडीतील मित्र मैत्रिणींचा व्हाॅट्स अप गृप मधून एकमेकांशी संम्पर्क होत होता. अशात सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी भेटून बालपणाच्या आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली त्याला सर्व मित्र मैत्रीणीनी सकारात्मक प्रतिसाद देत चिखलदरा येथील निसर्गरम्य परिसरातील हाॅटेल मध्ये भेटण्याची योजना आखून तेथे दोन दिवस मुक्कामी राहत स्नेह मिलन सोहळ्यात जुण्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचे विचार आत्मसात करत तरूणाईतील गंमतीशीर टिंगल टवाळीने हसतमुखत गाणी गात आनंदी व प्रसन्नतेच्या वातावरणात हा स्नेह मिलन सोहळा संम्पन्न झाला.
यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून माजी विद्यार्थी उपस्थित झाले होते. यावेळी सर्वांनी एकत्र आलेल्या ग्रृपच्या माध्यमातून समाजातील तळागाळात असलेल्या नागरिकांना सहकार्य करण्याचे ठरविले आहे.