• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

घटनादुरुस्ती विधेयक : सर्वपक्षीयांकडून ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची एकमुखी मागणी

Team by Team
August 12, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
123 1
0
Indian-Parliament
50
SHARES
884
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : राज्यांना इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) यादी तयार करण्याचा अधिकार देणारे 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. लोकसभेने मंगळवारी त्याला मंजुरी दिली होती.

राज्यसभेत सर्वच सदस्यांनी या घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला. त्याबरोबरच आरक्षणाची सध्याची 50 टक्क्यांची मर्यादा वाढविली तरच या निर्णयाचा लाभ होऊ शकेल; अन्यथा ते निरर्थक ठरेल, असे मत अनेक सदस्यांनी या विषयावरील चर्चेत व्यक्त केले.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

50 टक्क्यांची मर्यादा हटवा : खा. संभाजीराजे

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये पहिल्यांदा आरक्षण दिले होते. या आरक्षणात अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता.

2007 पासून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरू आहे. 50 टक्क्यांची मर्यादा उठवल्याशिवाय महाराष्ट्रात मराठा आरक्षण शक्य नाही, असे खासदार संभाजीराजे यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले.

आरक्षणासंबंधी अपवादात्मक परिस्थिती आहे की नाही? हे ठरवण्याचे अधिकार राज्यांना आहेत. परंतु, घटनेत काही बदल असतील, तर त्यात बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत.

हे बदल करण्याचे अधिकार केवळ केंद्र सरकारकडेच आहेत.

अशात अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण 50 टक्क्यांपुढे घेऊन जाताना राज्याच्या शिफारशीवर केंद्र सरकारने तो निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

दरम्यान, विधेयकावर प्रत्यक्षात चर्चा सुरू झाल्यावर संभाजीराजे यांना बोलण्याची संधी सभापतींकडून देण्यात आली नाही.

अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचे ते वंशज असल्याची बाब सभापतींच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर संभाजीराजे यांनी विधेयकासंबंधी आपली भूमिका सभागृहात मांडली.

जातीनिहाय जनगणनेपासून सरकारचा पळ : सिंघवी

राज्यसभेत या विधेयकावर चर्चेची सुरुवात करताना काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप केला.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीदेखील जातीनिहाय जनगणनेचे समर्थन केले आहे. अशात केंद्र सरकार यावर मूग गिळून गप्प बसले असल्याचे ते म्हणाले.

खासगी क्षेत्रात सरकारने आरक्षण लागू करावे : खरगे

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, या घटनादुरुस्ती विधेयकामुळे देशातील 65 टक्के लोकांना लाभ अपेक्षित आहे. सरकारने 50 टक्क्यांची मर्यादा हटविली पाहिजे.

या विधेयकात अजून एक तरतूद केल्यास राज्य सरकार 50 टक्क्यांहून अधिकचे आरक्षण देऊ शकेल. नाही तर मराठा, लिंगायत समाज पुन्हा आंदोलन करतील.

महाराष्ट्रात मराठा आरक्षण कसे लागू होईल : संजय राऊत

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लाखो मराठा तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी शिस्तबद्धरीत्या आंदोलन केले आहे. कायदा-सुव्यवस्थेची कुठलीही समस्या उद्भवलेली नाही.

यासाठी आम्हाला हे विधेयक आणावे लागले, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हे घटनादुरुस्ती विधेयक घेऊन येण्याची मागणी केली होती.

परंतु, या विधेयकानंतर मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे का? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Tags: 127 वी घटनादुरुस्ती विधेयकAmendment Bill in Parliament
Previous Post

छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाही

Next Post

तेल्हारा तालुका खरेदी विक्री संघाची प्रशासकीय समिति गठित, मुख्य प्रशासक पदी अनिता अरबट यांची नियुक्ति

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
तेल्हारा तालुका खरेदी विक्री संघाची प्रशासकीय समिति गठित,  मुख्य प्रशासक पदी अनिता अरबट यांची नियुक्ति

तेल्हारा तालुका खरेदी विक्री संघाची प्रशासकीय समिति गठित, मुख्य प्रशासक पदी अनिता अरबट यांची नियुक्ति

‘कोव्हिड-19’ची लस

लसीकरण : स्तनदा मातांनी घ्या ‘कोव्हिड-19’ची लस

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.