• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 1, 2023
23 °c
Ashburn
24 ° Tue
22 ° Wed
18 ° Thu
17 ° Fri
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल

२५ जिल्ह्यांतील सर्व दुकाने, आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची शिफारस, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत

Team by Team
September 25, 2021
in Corona Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
301 6
0
unlock Lockdown
45
SHARES
2.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यात ११ जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या नियंत्रणात येईपर्यंत, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले जातील. मात्र, उर्वरित २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची शिफारस सार्वजनिक आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या २५ जिल्ह्यांतील सर्व दुकाने, आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची शिफारसही करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर हे निर्णय अमलात येतील, असे सांगून टोपे यांनी उशिरात उशिरा सोमवारपर्यंत महाराष्ट्राला दिलासा मिळेल, असेही स्पष्ट केले.

मुंबईच्या ‘लोकमत’ कार्यालयात टोपे यांनी भेट दिली. त्यावेळी दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, आज आपण जपानचे कौन्सिल जनरल यांच्याशी चर्चा केली. जपानमध्ये आत्तापर्यंत चार लाटा येऊन गेल्या. पाचवी लाट त्यांच्याकडे मोठी आहे. एकाच दिवशी त्यांच्याकडे दहा हजार रुग्ण निघाले आहेत. याचा तपशिल विचारला असता ते म्हणाले, ऑलिम्पिकमुळे आमच्याकडे दहा हजार रुग्ण वाढले, असा प्राथमिक अंदाज आहे. ज्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी रुग्ण वाढतात, असा अंदाज आहे. ऑलिम्पिकमुळे जपानमध्ये वाढलेले रुग्ण, मुंबईत लोकल सुरू करण्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. त्यामुळे लोकल सुरू करण्याविषयी विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला नव्याने अर्थचक्र सुरू ठेवावे लागेल. यावरही विस्तृत चर्चा झाल्याचे टोपे यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.

हेही वाचा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’ चा शुभारंभ

श्वान पाळणा-यांनी श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करून घ्यावे

केंद्राकडून जास्तीचे डोस मिळावेत
महाराष्ट्राला लसीचे जास्तीत जास्त डोस मिळावेत, यासाठी आपण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी समक्ष बोललो. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे, की तुम्ही आमच्या सोबत दिल्लीला चला. मात्र, महाराष्ट्राला जास्तीत जास्त डोस मिळवून द्या. महाराष्ट्राला जर महिन्याला तीन कोटी असे सहा कोटी डोस दोन महिन्यात मिळाले तर आपण दहा कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण करू, असेही टोपे यांनी सांगितले. बारा कोटीच्या महाराष्ट्रात आपण साडेचार कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

ऑगस्ट अखेरीपर्यंत काळजी आवश्यक
आता आपण अशा टप्प्यावर आहोत, की जर आपण काळजी घेतली नाही तर रुग्ण संख्या वाढू शकते. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री वेगवेगळ्या डॉक्टरांशी तसेच टास्क फोर्सच्या सदस्यांशी सतत बोलत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेतली. कशा पद्धतीने लोकलसेवा सुरू करता येईल, यावर त्यांची चर्चा झाली, असेही टोपे यांनी सांगितले.

काय आहेत शिफारशी ?

सर्व खासगी आस्थापनांना ५०% टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी.
लग्न समारंभ, मृत्यू, नाटक – सिनेमा या सगळ्या गोष्टींसाठी आता उपस्थितीच्या संख्येवर असणारे निर्बंध शिथिल केले जातील.
नाटक सिनेमांसाठी ५०% उपस्थितीची परवानगी.
न्यू नॉर्मल या पद्धतीचे आयुष्य आता कोरोनासोबत जगावे लागेल. त्यासाठी मास्क न वापरणाऱ्या लोकांना कठोर दंडाची शिफारस.
मास्क, सॅनिटायझर या गोष्टी अनिवार्य असतील.
या जिल्ह्यांतील निर्बंधात शिथिलता येणार
मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम.

येथे निर्बंध कायम कारण…
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, त्यासोबत कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि अहमदनगर, बीड या ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध एवढ्या लवकर कमी केले जाणार नाहीत. या ठिकाणची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरच निर्बंध शिथिल केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

ज्यांना लसीकरणाचे दोन डोस देण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी मुंबईत लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, या विषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री ठाकरे टास्क फोर्सच्या सदस्यांशी बोलून घेतील. – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Tags: Maharashtra lockdown Restriction
Previous Post

पोटावरील चरबी कमी करण्याचे उपाय, घरच्या घरी करा ही याेगासने

Next Post

ईसापुरचे भूमिपुत्र सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदडे यांची उपायुक्त पदी पदोन्नती

RelatedPosts

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’ चा शुभारंभ
Featured

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’ चा शुभारंभ

September 29, 2023
रेबिज
Featured

श्वान पाळणा-यांनी श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करून घ्यावे

September 28, 2023
भारतीय तरुणांची हृदये होत आहे कमकुवत
Featured

भारतीय तरुणांची हृदये होत आहे कमकुवत

September 28, 2023
तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा
Featured

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित

September 28, 2023
मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रकिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Featured

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रकिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

September 27, 2023
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी
Featured

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी

September 27, 2023
Next Post
ईसापुरचे भूमिपुत्र सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदडे यांची उपायुक्त पदी पदोन्नती

ईसापुरचे भूमिपुत्र सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदडे यांची उपायुक्त पदी पदोन्नती

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी विलास बेलाडकर

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी विलास बेलाडकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

rain

बुलडाण्यात ढगफुटी 30 जनावरांचा मृत्यू

September 26, 2023
तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित

September 28, 2023
100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार बाद

100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार बाद

September 27, 2023
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’ चा शुभारंभ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’ चा शुभारंभ

September 29, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

Verified by MonsterInsights