तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा पालिकेमध्ये सुरू असलेल्या पंतप्रधान घरकुल योजना , रमाई घरकुल योजना, आय. एच. यस. डीपी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान देवून गुंठेवारी चा प्रश्न सोडविण्यात यावा याकरिता तेल्हारा विकास मंचच्या वतीने अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना तोंडावर काळ्या पट्टा बांधून निवेदन देवून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तेल्हारा नगरपालिकेत केन्द्रशासनाची प्रधानमंत्री आवास योजना हि घरकुलची योजना सुरु आहे . या योजने करिता केवळ राज्य शासनाचाच २ कोटी 22 लक्ष निधि प्राप्त झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . पालिकेत भाजपची सत्ता आहे , केंद्रात भाजपची सत्ता आहे काही महिन्यापूर्वी राज्यात सुद्धा भाजपची सत्ता होती , या भागातील खासदार व आमदार सुद्धा भाजपचे आहेत तरी सुद्धा केंद्राकडून निधि खेचुन आनला नाही त्यामुळे ज्यांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाचे बांधकाम उसनवारी, व व्याजाने पैसे आणून केले त्यांच्यावर आता व्याज भरण्याची , उपासमारीची पाळी आलेली आहे त्यामुळे सदर घरकुल धारकांना त्यांचे हक्काचे अनुदान विनाविलंब देण्यात यावे कारण अनुदानाअभावी अनेकांचे घरकुलाचे काम अपूर्ण राहिले आहेत.
घरकुल धारकाना अळीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे . या मध्ये राज्य शासनाचा एक लाख रुपये व केंद्र सरकार चा दिळ लाख रुपये हिस्सा आहे . योजना हि केन्द्रशासनाची असून सुद्धा केंद्र शासना कळून तेल्हारा पालिकेला काहीच अनुदान मिळाले नाहि. सदर घरकुल योजने करिता मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अर्ज करण्यात आलेत्यापैकि केवळ 344 अर्ज मंजूर झाल्याचे समजते राज्यशासनाकळून मिळालेल्या निधिमधुन १२९ जनानाच अनुदान देण्यात आले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले इतरांना मात्र अद्याप लाभ मिळाला नाही तसेच सदर घरकुल योजनेअन्तर्गत काही महिन्यापूर्वी बहुतांश घरकुल धरकांना घरकुल मंजूर झाल्याचे पत्र देण्यात आले होते मात्र १७ महिन्यानंतर पुन्हा तृटीचे अर्ज दिल्या गेले त्यामुळेच घरकुल धारकांना लाभ मिळू शकला नाही . तृटया दूर करण्या बाबत जो ठराव घेण्यात आला त्याची नगराध्यक्ष यांनी युद्धपातळी वर अंमलबजावणी करून घेऊन घरकुल धरकांना न्याय मिळवून दिला नाही हा विषय सर्वाना माहितच आहे अश्या प्रकारे घरकुल धरकांचा मानसिक छळ करण्यात येत आहे तसेच राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गुंठेवारी व N .A. बाबतचा प्रश्न तात्काळ निकाली काढून पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ज्यांनी अर्ज केले आहे त्या सर्वांना अनुदान देण्यात यावे.
तसेच पालीके अंतर्गत रमाई घरकुल योजने करीता जवळपास ४० च्यावर लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळाला नाही तरी रमाई घरकुल योजनेचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा तसेच आय एच एस डीपी योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत शेवटचा टप्पा मिळाला नाही त्यांना सुद्धा सदर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात यावे शहरातील बंद असलेले एलईडी लाईट लवकर सुरू करण्यात यावे तसेच शहरातील विविध समस्यांचे निराकरण करून स्वच्छतेकडे लक्ष द्यावे या सर्व घरकुल धारकांचा व इतर प्रश्न लवकरात लवकर निकाली न काढल्यास तेल्हारा विकास मंच ला या पुढे आंदोलनाचा मार्ग स्वीकारा लागेल आंदोलनादरम्यान काही विपरीत घटना घडल्यास त्याला संपूर्णपणे नगराध्यक्ष मुख्याधिकारी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन अध्यक्ष व मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना देण्यात आले आहे. यावेळी विकास मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वी सदर मागणीबाबत अनेक वेळा जोराने घोषणा , निदर्शने करून सुद्धा पालिका अधिकारी पदाधिकाऱ्यांवर काही फरक पडत नसल्याचे दिसून आल्यामुळे यावेळेस तोंडावर काळ्या पटया बांधून पालिकेमध्ये ठिय्या आंदोलन सुद्धा केले यावेळी मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.