वाडेगाव(डॉ चांद शेख)– जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा दधम ता.बाळापूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्काऊट युनिटने या वर्षी सुध्दा 1001 बियांचे नैसर्गिक पध्दतीने बिजारोपण तथा वृक्षसंवर्धन कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करीत परिसरात असना-या पडिक जमिनीवर दधम फाटा ते गावालगत रस्त्याच्या दुतर्फा परिसरात तग धरणा-या वनस्पती जसे कडूनिंब, आंबा,चिंच,बोर जांभूळ,टिकोमा ह्या वनस्पतींच्या बियावर नैसर्गिक प्रकिया करून पडीक जमिनीवरील काटेरी झाडांच्या बुंध्याजवळ प्रत्येकी 5ते 6 बिया माती उखरून टाकण्यात आल्या.
अशा पध्दतीने बिजारोपण केल्यास झाडाची रोपे तयार करावी लागत नाहीत तसेच झाडांना पाणी सुध्दा द्यावे लागत नाही कारण पावसाळ्यात बियांची ऊगवण झाली की झाडांच्या बुंध्याजवळ नैसर्गिक ओल राहते त्यामुळे झाड मरण्याचे प्रमाण कमीच असते व झाडाचे संरक्षण सुध्दा करावे लागत नाही कारण झाड हे काटेरी झाडाच्या बुंध्याजवळ असल्याने जनावरापासून सुध्दा संरक्षण होते. त्यामुळे झाडाचे नैसर्गिक पध्दतीने संगोपन होते. वृक्ष लागवडीचे व संगोपणाचे उद्दीष्ट साध्य करता येते.
कोरोना सारख्या वेदनादायक भयंकर महामारीने समाजाला दाखवून दिले की माणसाला जगण्यासाठी प्रतिष्ठा, पैसा,पद आणि परिस्थिती नाही तर प्राणवायूची फार मोठी गरज आहे, कोरोना काळात प्राणवायुच्या कमतरतेमुळे अनेक निरपराध जवळची जीवा भावाची माणसं कायमची सोडून गेलीत.
मानवाच्या सततच्या हस्तक्षेपामुळे नष्ट होत चाललेली जंगल व झाडे आपल्यासाठी किती उपयोगाची आहेत हा अनुभव इथल्या प्रत्येकाला कोरोना महामारीच्या काळात आला असावा…!आपल्या आंतरिक शक्ती करिता निसर्गनिर्मित प्राणवायुची गरज आहे. अशा वेळी संत तुकाराम महाराज यांच्या ओव्या प्रकर्षाने आठवतात “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” बिजारोपण साठी मु.अ.प्रल्हाद हाडोळे,मोहम्मद अली,मनोज चव्हाण,युनिट लिडर दत्तात्रय सोनोने,स्काऊट सुमेध सुखाने,विशाल लेकुरवाळे, ओम जाधव,तेजस आडे,योगेश खुळे, रोशन खुळे, मयूर खुळे यांनी सहभाग घेतला. स्काऊट चळवळीमध्ये नऊ नियमाचे पालन केले जाते.त्या पैकी 5वा नियम हा प्राणी-मात्राचा मित्र असतो व तो निसर्गावर प्रेम करतो”* या स्काऊटच्या पाचव्या नियमाला आचरणात आणण्याचा युनिट ने केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.