अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील शेगाव रोड चे काम अत्यंत संथगतीने व निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे, असे युवा स्वाभिमान पार्टी च्या निदर्शनात आले, याबाबतीत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहे परंतु याबाबत शासनाने कुठलेही दखल घेतली नाही, या रस्त्यावरूनच शेगावीच्या संत गजानन महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूरला जात असते ,तसेच या रस्त्यावर भारत पेट्रोलियम चे मुख्य कार्यालय व स्टोरेज सुद्धा आहे, त्यामुळे शेकडो ट्रक या रस्त्याने ये-जा करीत असतात. शेगाव खामगाव मार्गावरील अकोला शहराला जोडणारा हा मुख्य रस्त्यापैकी एक हा रस्ता आहे ,त्यामुळे रस्त्यावर सतत वर्दळ असते, कच्चा रस्त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अत्यंत त्रास होत आहे तसेच या रस्त्यावर धुळीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झालेआहे त्यामुळे दिवसेंदिवस आरोग्याबाबत नागरिकांच्या तक्रारी सुद्धा वाढले आहेत, या रोडवर पावसामुळे चिखल साचून अनेक अपघात होतात.
या सर्व समस्या बाबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांना आज युवा स्वाभिमान पक्षाचे अकोला महानगराध्यक्ष सुमित पाखरे यांनी आज निवेदन दिले या रोडचे काम तातडीने पंधरा दिवसाचे आत सुरू करावे अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदना मार्फत दिली आहे, पंधरा दिवसांमध्ये काम सुरू न झाल्यास युवा स्वाभिमान पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला, यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे प्रतीक शिरसाट, चिकू वानखडे, मंगेश इंगळे, अक्षय सपकाळ, प्रतीक सुरवाडे, सुमित पांडे, गोपाल पाटील यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते