अकोला- अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणी होऊन पंधरा दिवस जास्त झाले आहेत तरीसुद्धा युरिया देण्यात येत नाही नेमक युरिया ला अभय तरि कोणाचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे बफर स्टॉक खुला करण्यात यावा जणे करुन शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल. कित्येक दिवसा पासून कृषी केंद्र धारकांना तारीख पर तारिक देण्यात येतात गोडाऊन भरुन युरिया उपल्ब्ध असुन सुद्धा शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.तरि अकोला जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात अशी मागणी आँनलाईन मेल द्वारे करण्यात आली आहे.
युरिया चा स्टाक रोकुन अव्वा चे सव्वा भावाने विक्री केली जाते व नंतर शेतकऱ्यांची लूट केली जाते शेतकरी हा भारताचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो कर्ज बाजारी होऊन बॅंकेचे कर्ज काढून शेती करतो आणि वेळेवर जर त्याला त्याच्या पिकाला योग्य खताचा वापर केला गेला नाही तर त्या पिकांची उगवण क्षमता कमी होते व त्यामुळे पिकाला त्याचा जसा पाहिजे तसा उपयोग होत नाही युरिया हा सर्वात महत्त्वाचा घटक शेतीसाठी माणला जातो पिक वाढिसाठि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे म्हणून शेतकरी युरिया व इतर खता मध्ये मिक्स करून पिकाला देतात.
अकोला जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेऊन शेतकऱ्यांना युरिया चा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी प्रदिप विष्णू कोलटक्के युवा मोर्चा अकोला पूर्व प्रसिध्दी प्रमुख यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना आँनलाईन मेल द्वारे केली आहे….