तेल्हारा(प्रतिनिधी)– तालुक्यातील रस्त्यांची झालेली बिकट परिस्थिती सुधारावी यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण आज पालकमंत्री बच्चू कडू यांच्या ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून शहरातील विशाल नांदोकार या युवकाने तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते पहिल्याच दिवसांपासून नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने अनेक ग्रामपंचायती संघटना सार्वजनिक मंडळे यांनी आपले समर्थन दिले होते.
हजारो नागरिकांनी आपली मनोगत तसेच स्वाक्षरी अभियान सुद्धा राबवण्यात आले होते यावेळी उपोषण कर्ता विशाल नंदोकार यांनी जिथं पर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि नागरिकांचा रोष बघता जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत दखल घेत आज उपोषण स्थळी जाऊन अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून लगेच याबाबत तोडगा काढला आणि उपोषण कर्ता विशाल नंदोकार यांना लगेच काम सुरु करु असे आश्वासन दिल्यानंतर विशाल नांदोकार यांनी उपोषण मागे घेतले.यावेळी बच्चू कडू यांनी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उपोषण कर्ता विशाल नांदोकार यांच्या हस्ते करून कामाला सुरुवात करण्यात आली.आणि अखेर पाच दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी हजाराच्या वर नागरिकांनी उपोषण स्थळी आज उपस्थिती दर्शवली होती.यावेळी तेल्हारा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उपोषनाला का बसलो
उपोषण कर्ता विशाल नांदोकार याने खुद्द आमरण उपोषणाला का बसलो याबाबत पालकमंत्री बच्चू कडू सांगितले यामध्ये नांदोकार यांनी सांगितले की मी व माझी पत्नी शेगाव येथे दर्शनाकरिता जात असतांना वाटेत एका महिलेची खोदलेल्या रस्त्यांमुळे चारचाकी मधेच डिलिव्हरी झाली तेव्हा त्या नवजात बालकाची नाळ एका दगळाने तोडावी लागली या सर्व घटनेला रस्त्यांची बिकट परिस्थिती होती त्यामुळे ही बाब मनाला चटका लावून गेल्याने हि परिस्थिती अजून कोणाच्या नशिबी येऊ नये म्हणून आज मी आमरण उपोषणाला बसलो असे कडू याना सांगितले
अधिकाऱ्यांची काढली पाळकमंत्र्यांनी खरडपट्टी
गेल्या पाच दिवसांपासून रस्त्यांची परिस्थिती सुधारावी वृक्षांची झालेली कत्तल दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी उपोषणाला बसलेल्या विशाल नंदोकार यांचे उपोषण सोडवण्यासाठी आलेल्या बच्चू कडू यांनी बांधकाम विभागाच्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सांगण्यात येत आहे.रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करावी असा दम सुद्धा त्यांनी यावेळी दिला.