• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 31, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्र संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने

Team by Team
September 25, 2021
in Featured, Corona Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
Lockdown
12
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वेगाने भर पडत आहे. हे पाहता 10 दिवसांनंतर राज्यात 11 ते 12 लाख सक्रिय रुग्ण असतील. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याचा भार पेलवणार नाही, असे आरोग्य विभागाने राज्य सरकारला कळविले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना बोलावले आहे.

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शनिवारी दुपारी होणार्‍या बैठकीनंतर ठाकरे सरकार लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी, मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

राज्यात दररोज 50 ते 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मागील 9 दिवसांपासून 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. सरकारने आरोग्य सेवासुविधा वाढवल्या असल्या तरी रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास ती सुविधा कमी पडणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. डॉक्टर, नर्सेस व इतर प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट तीव्र असून, अजून किमान महिनाभर तरी ती राहील, अशी भीती केंद्रीय पथकांनी व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर पुढील 10-12 दिवसांनंतर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 ते 12 लाखांच्या घरात जाईल व त्या परिस्थितीत त्यांना आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण सक्षम नसू, असे बजावले आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोरोना साखळी तोडण्यासाठी सध्या तरी तातडीचा उपाय म्हणून पूर्णत: लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी चर्चा आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी सद्य:स्थितीबाबत चर्चा केली. यात एमपीएससी परीक्षा, विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा, सध्या लावण्यात आलेले कठोर निर्बंध, विकेंड लॉकडाऊन आदींसह राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख मंत्री व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.

21 दिवसांचा लॉकडाऊन हवा

विजय वडेट्टीवार यांनी केवळ विकेंड नव्हे तर 21 दिवसांचा कडक व संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 15 ते 21 दिवस लागतात. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाची साखळी तोडणे आणि आवश्यक व पायाभूत सेवा-सुविधा उभारणे शक्य होते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यातील आरोग्य सेवा- सुविधांची स्थिती

* 81 टक्के आयसोलेशन बेडस् भरले
*17 टक्के कोरोना संशयितांनी बेडस् भरले
* 33 टक्के ऑक्सिजन बेड भरले
*60 टक्के आयसीयू बेडस् भरले
*33 टक्के व्हेंटिलेटर्स भरले

सक्रिय साडेपाच लाख रुग्णांची स्थिती
* 60 टक्के गृह विलगीकरण
* 40 टक्के संस्थात्मक विलगीकरण
* 5 टक्के रुग्ण ऑक्सिजनवर
* 1 टक्के आयसीयू बेडवर
* 1 टक्केपेक्षा कमी रुग्ण व्हेंटिलेटरवर

रेमडेसिवीरचा पुरवठा वीस दिवसांनंतर

एकूण रुग्णांपैकी 10 ते 15 टक्के गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासू शकते. अशा स्थितीत राज्याला दररोज सव्वा ते दीड लाख रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज लागणार आहे. मात्र, किमान पुढील 20 दिवस रेमडेसिवीरचे अपेक्षित उत्पादन करणे अशक्य असल्याचे सांगत या कंपन्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारसमोर रेमडेसिवीर औषध उपलब्ध करून देण्याचे गंभीर आव्हान असेल.

कोरोना चाचणीसाठी लागणार्‍या सामग्रीचाही तुटवडा

राज्यातील साडेपाचशेहून अधिक प्रयोगशाळा, दररोज दोन ते सव्वादोन लाख कोरोना चाचणी करत आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत भाजीपाला, किराणा दुकानदार, डिलिव्हरी बॉय, खासगी कार्यालयातील कर्मचार्‍यांना दर 15 दिवसाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या करणार्‍या नागरिकांची भर पडली आहे. त्यामुळे चाचणीसाठी लागणार्‍या सामग्रीचा तुटवडा भासत आहे.

ऑक्सिजनची कमतरता

राज्यात दररोज 1 हजार 200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे तर मागणी 800 मेट्रिक टन आहे. 10 दिवसांनंतर 1 हजार 700 ते 1 हजार 800 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची मागणी असेल. राज्य सरकारने इतर राज्यांतून महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे.

Tags: lockdown in maharashtra
Previous Post

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

Next Post

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना घरी जाऊन लसीकरण कसे काय करण्यात आले, उच्च न्यायालयाचा सवाल

RelatedPosts

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Featured

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2025
अकोला
Featured

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी, मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

July 31, 2025
शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र
Featured

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

July 30, 2025
जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू
Featured

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

July 28, 2025
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद
Featured

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

July 28, 2025
राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी
Featured

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
Next Post
न्यायालय

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना घरी जाऊन लसीकरण कसे काय करण्यात आले, उच्च न्यायालयाचा सवाल

दीरासोबतच्या असलेल्या अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या, मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याचा केला बनाव

दीरासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे पतीची निर्घृण हत्या, मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याचा केला बनाव

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

July 28, 2025

पोलीस स्टेशन तेल्हारा हद्दीतील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणा-या पखवाज वादकास अटक!

July 29, 2025
शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

July 30, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.