तेल्हारा (प्रतिनिधी)– जिल्ह्यात सदैव अनेक समस्यांबाबत चर्चेत राहणारी तेल्हारा नगर परिषदेने नुकताच तेल्हारा शहरातील विविध विकास कामासाठी सन 2020 – 2021 चा अर्थ संकल्प सादर केला आहे .हा अर्थ संकल्प कुचकामी असल्याचा तसेच शहरातील विविध समस्यांबाबत चे व भ्रष्टाचार गैरप्रकाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप युवासेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे यांनी केले आहे.
तेल्हारा नगर परिषद मधील कुचकामी धोरणा मुळे शहर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे .शहरातील विविध सामाजिक सभागृहांची दयनीय अवस्था आहे त्याच बरोबर शहरातील स्वच्छतेचे बारा वाजले आहे शहरातील नाल्या तुडुंब भरल्या असून रोगराई पसरत आहे . कोट्यवधी रुपयांची नवीन नळ पाईपलाईन योजना भ्रष्टाचाराने व्यापली आहे .ठेकेदारांना पाठीशी का आणि कशासाठी घातल्या जाते हा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थिती केला आहे .त्याच बरोबर शहरातील मूलभूत सुविधा सुद्धा नागरिकांना मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे कारण शहरातील बहुतांश भागातील स्ट्रीट लाईटचे वाटुळे झाले आहे .शहरातील प्रतिष्ठेचा समजाला जाईल आणी तेल्हारा नगरीत सुशोभीकरण साठी रणगाडा खेचून आणण्याचे जाहिरात बाजी करून सांगणाऱ्या सत्तारूढ नगर परिषद ने माँ साहेब जिजाऊ उद्यान कडे सुद्धा सपशेल दुर्लक्ष आहे. शहरातील नगर परिषद शाळांचे सुद्धा तीच बिकट परिस्थिती आहे. जलशुद्धीकरण केंद्र बिकट परिस्थिती व अशुद्ध पिण्याचे पाणी , वैकुंठ धाम, स्विमिंग टॅंक, अश्या कीती तरी समस्या चे भांडार असून सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्यांवर नागराध्यक्षा का चुप्पी देतात असा प्रश्न सुद्धा युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे यांनी उपस्थित केला आहे .