तेल्हारा – तेल्हारा तालुका सहकार क्षेत्रा सह नगर परिषद ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये शेतकरी पॅनल चा गेल्या 20 वर्षा पासून निर्विवाद दबदबा कायम आहे. तेल्हारा तालुका सहकार पॅनल च्या विरोधात लढण्यासाठी शेतकरी पॅनल ची स्थापना स्व अन्नासाहेब बिहाडे यांनी स्व.रमेश खारोडे, शांतारामजी काळे,शेषराव पाथ्रीकर,दौलतभाऊ वडतकार व तालुक्यातील इतर नेते व कार्यकर्त्याना घेवून केली. स्व.रमेशराव खारोडे यांनी अन्नासाहेब बिहाडे यांचे मार्गदर्शनात शेतकरी पॅनल ला तळागाळात पोहोचविण्याचे कार्य केले. शेतकरी पॅनल 50 टक्के समाजकारण व 50 टक्के राजकारण या धर्ती वर काम करण्याचा उद्येश ठेवून जनसामान्याचे समस्या सोडविण्यासाठी स्व रमेश खारोडे यांनी प्रामाणीकप्रयत्न केले. नगर परिषद तेल्हारा क्षेत्रात नागरीकांचे समस्याचे निवारण करण्याचेमोलाचे काम केले. रमेशभाऊ च्या निधना नंतर स्व. अन्नासाहेब बिहाडे, शांतारामजीकाळे, सुधाकरराव येवले, गजानन तराळे, तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर सोबत घेवून संदिप खारोडे यांना निवडणुक लढण्या करीता शेतकरी पॅनल च्या माध्यमातुन समोर करुन सहकार गटाचे सुरेश तराळे यांचे राजकारणाला सुरुंग लावण्यास सुरवात केली.
सर्व प्रथम शेतकरी पॅनल ने भा.ज.पा. व भा.रि.प/बहुजन महासंघ सोबतयुती करुन कषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लढविली. त्या माध्यमातुन सहकारपॅनल चे सुरेशराव तराळे यांचा दारुन पराभव केला. तर संदिप खारोडे यांना बाजारसमितीचे सभापती पदी विराजमान केले. ठरल्या प्रमाणे कुठल्याही गोष्टीचापरिणामाचा विचार न करता राजकारणात दिलेला शब्द पाळणे हे ध्येय ठेवून संदिप खारोडे यांनी सभापती पदाचा राजीनामा देवून भारिप चे रमेशभाऊ दारोकार यांना सभापती केले.तर उपसभापतीपदी विश्वास मार्के विराजमान झाले. त्याच काळात जिल्हयातील अति महत्वाची निवडणुक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बॅक त्या निवडणुकी मध्ये सुध्दा शेतकरीपॅनल ने सौ रुपाली संदिप खारोडे यांना उमेदवारी दिली. व त्या निवडणुकीत सुरेश तराळे यांचा पराभव केला. व सहकार क्षेत्रा वर जबददस्त पकळ निर्माण केली. त्यानंतर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस सुरेश तराळे हयांचा झालेला पराभव पाहून त्यांचे सहकारी त्यांना सोडून गेले. मग सुरेश तराळे यांना जबरदस्त धक्का बसला. त्यावेळेस शेतकरी पॅनलचे नेत्यांनी सहकार पॅनल यांचे सोबत युती केली.
यावेळेस अन्नासाहेब बिहाडे हयांनी सहकार पॅनल यांचे सोबत युती करण्यास विरोध केला. तरी सुध्दा सहकार पॅनल सोबत शेतकरी पॅनल च्या नेत्यांनी युती केली व कृ उ बा समितीवर दनदणीत विजय संपादीत केला. व सुरेश तराळे हयांना सभापती पदी विराजमान केले. तेव्हापासुनच स्थानिक नेते यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकी वर डोळा ठेवून शेतकरी पॅनलच्या नेत्यांमध्ये मध्ये वाद लावण्यास सुरवात केली. तसेच शेतकरी पॅनल मध्ये फुट पाडण्यास सहकार नेते यशस्वी झाले. व आता झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीकरीता सहकार क्षेत्रातील शेतकरी सहकार गटाचे लोक एकत्रित करुण 5 लोकांचे नामांकन पत्र दाखल केले. तर शेतकरी पॅनल च्या शांतारामजी काळे यांचेसुचने वरुन संदिप खारोडे यांनी सौ रुपाली संदिप खारोडे यांना उमेदवारी दिली. सहकार नेते तराळे यांनी सर्व 35 मतदारां सोबत संपर्क करुन चाचपाणी केली. व निवडणुकीतून यशस्वी माधार घेत विड्राल केला.
. सहकार गटाच्या सर्व महत्वाच्या व दिग्गज लोकांनी नारायण मोहोड यांना निवडूण आणण्या करीता अतोणात प्रयत्न केले. तर त्यांचेविरोधात संदिप खारोडे यांनी सर्व समाजातील व सर्व घटकातील नेते मंडळी व कार्यकर्त्याना आगळी वेगळी व्युव रचना रचून ही निवडणुक लढविली. शेतकरी पैनल ने साम,दामदंड भेद चा वापर न करता शांतता,संयमता व शालीनता ने निवडणूक लढवून विजय संपादन केला. त्यांना विजयी करण्याचे विळा पुरुषोत्तम पाथ्रीकर सभापती बाजार समिती, व नयना मनतकार हयांनी उचलला व त्यांना मोलाचे सहकार्य रमेश भाऊ दारोकार, जनार्धननागोलकार, शांतारामजी काळे डॉ गेबळ, नुसरत भाई,प्रकाशराव कुकडे व इतर शेतकरी पॅनलचे नेते व कार्यकत्यानी अतोणात प्रयत्न केले. व विजय संपादन केला. त्यामुळेसहकार गटातील नेते मंडळी वर 11 मते मिळाले मूळे आत्म परिक्षण करण्याची वेळ आली.व तालुक्यातील जनतेने इकडून जिकडे व तिकडून इकडे उडया मारणा-यां नेत्यांना त्यांची जागा दाखविली.