अकोला : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूरला स्थलांतरीत करण्याचा आदेश निघाल्यानंतर दोन दिवसांत कार्यालयातील साहित्या नागपूरला हलविण्याची घाई अधिकाऱ्यांना झाली होती. रविवारी सुटी असतानाही गुपचूप कार्यलायातील साहित्य ट्रकमध्ये भरून घेवून जात असल्याची माहिती भाजप व प्रहारच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी कार्यालयावर हल्लाबोल केला.
भाजपने स्थलांतराचा निषेध करीत कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले तर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आग्रमक होत आदर्श कॉलनीतील एका अधिकाऱ्याच्या घरापुढे थांबलेल्या ट्रकमधील साहित्य काढून नेत पुन्हा कार्यालयात नेऊन ठेवले. कार्यकर्त्यांचा हा आक्रमक पवित्रा बघून खदान पोलिसांना कार्यालयात बोलावण्यात आले होते.
जुने आरटीओ रोड येथे महाराष्ट्र पशूधन मंडळाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी वळू संगोपन, संशोधन व लसिकरणासाठी राज्य भरातील केंद्रांना निधी पुरविला जात होता. मात्र हे कार्यालय स्थलांतरीत करण्याचा डाव अनेक वर्षांपासून आखला जात होता.
अखेर ५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील वळू संधोशन केंद्रात अकोल्यातील कार्यालय स्थलांतरीत करण्याचा आदेश धडला. या आदेशाची अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून एकात दिवसातच करण्यात आली. रविवारी सुटीची दिवस असल्याने याकडे कुणाचे लक्ष जाणार नाही असे समजून अधिकाऱ्यांना कार्यालयातील साहित्य ट्रकमध्ये भरून स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली होती.
ही माहिती भाजप व प्रहारच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी कार्यालय गाठून साहित्य हलविण्यास विरोध केला.
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात नगरसेवक गिरीश जोशी, मनीराम टाले, माधव मानकर, देवाशीष काका, संतोष पांडे, गणेश अंधारे, मनोज शाहू, अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले, प्रशांत अवचार, आकाश ठाकरे, अभिजीत कडू, देवेंद्र तिवारी, डॉ. गौरव शर्मा, बन्सी चव्हाण, विकी ठाकूर, गणेश सपकाळ, राजे शिंदे, मनिष बाचोका, मनिष बुंदिले, मंगेश सांगा, रंजीत खेडकर, ओम कसले, विवेक देशमुख, संदीप गावंडे, आदींनी पशुसंवर्धन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठाेकले. खदान पोलिसांनी आंदोलन कार्यकर्त्यांना अटक केली.
या घटनेचा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी निषेध व्यक्त केला. रविवारी सुट्टी असताना हा प्रकार व तातडीने सामान हलवण्याची खरंच गरज होती का, असा सवाल सावरकर यांनी उपस्थित केला.