तेल्हारा (प्रतिनिधी)- आज सकाळी शहरातील एका ५७ वर्षीय इसमाने स्वताच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
शहरातील मिलिंद नगर येथील ५७ वर्षीय भीमराव तुळशीराम तायडे यांच्याकडे जेमतेम चार एकर शेती असून कर्ज काढून शेतीला पैसा लावला मात्र यावेळी निसर्गाच्या लहरीपणा मुळे हातचे पिक गेले त्यात बँकेचे कर्ज आणि नापिकी मुळे विवंचनेत पडलेल्या भीमराव तायडे यांनी आपल्या स्वतच्या शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी दहा वाजता उघडकीस आली.याबाबत तेल्हारा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला असून मृतक यांच्यामागे पत्नी दोन मुले,३मुलि;असा बराच आप्तपरिवार आहे.पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहे