नवी दिल्ली : जीवनातील फक्त 20 महिने जगलेल्या धनिष्ठा या चिमुकलीने तिच्या मृत्यूनंतर, 5 लोकांचा जीव वाचवून ‘जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये,’ या ‘आनंद’ चित्रपटातील अमर संवादावर मोहर उमटविली आहे. अर्थात, धनिष्ठाच्या मृत्यूचे दु:ख आभाळाएवढेच; पण ती एका वेगळ्या अर्थाने अमर झाली आहे. तिच्यामुळे 5 बालकांना जीवनदान मिळाले आहे.
अवयवदान, देहदान अन् देशातील स्थिती
अवयव न मिळाल्याने दरवर्षी भारतामध्ये 5 लाख जणांचा मृत्यू होतो.
भारतात केवळ .26 टक्के अवयवदान केलेे जाते. ते वाढायला हवे.
20 हजार रुग्ण आज लिव्हर ट्रान्स्प्लांटच्या प्रतीक्षेत आहेत.
10 लाखांमागे दक्षिण भारतात 1, तर उत्तर भारतात 0.01 देहदान होते.