• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, November 14, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कृषी कायदे ऐतिहासिकच, शेतकर्‍यांची दिशाभूल थांबवा-पंतप्रधान नरेंद्र मोदी

Team by Team
December 17, 2020
in Featured, राष्ट्रीय, शेती
Reading Time: 1 min read
79 1
0
नोकरी
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

कृषी कायदे ऐतिहासिकच असून, शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मंगळवारी येथे केले. या कायद्यांविरोधात काही विरोधी पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी शेतकर्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. देशाला बदनाम करण्याच्या कटाचा हा फार मोठा भाग आहे, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.

या कायद्यांबाबत शेतकर्‍यांच्या मनात असलेला कुठलाही संशय दूर करण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे. शेतकर्‍यांनी विरोधकांच्या कटात न सापडता चर्चेचा मार्ग स्वीकारावा. माझे सरकार शेतकर्‍यांसाठी समर्पित आहे. त्यांचे नुकसान कदापि करणार नाही; उलट सर्व बंधनांतून मुक्त करून, त्यांच्या उत्पन्नात वाढच होणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गुजरातच्या सीमावर्ती कच्छ जिल्ह्यात पंतप्रधानांनी आज काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते.

हेही वाचा

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

भाजपाने आतापर्यंत शेतकर्‍यांचे हितच साधले आहे, असे स्पष्ट करताना त्यांनी गुजरातमधील दोन क्षेत्रांचे उदाहरण दिले. सरकारच्या कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय दुग्ध व्यवसाय आणि मासेमार हे दोन क्षेत्र फुलले आहेत. या क्षेत्रांमधील व्यवसाय सहकारी क्षेत्रातील लोक आणि शेतकर्‍यांकडूनच केला जातो, असे त्यांनी सांगितले.

मी हे उदाहरण यासाठी देत आहे, कारण केंद्राने सप्टेंबरमध्ये पारित केलेले तीन कृषी कायदेदेखील शेतकर्‍यांसाठी हिताचे आहेत. बाजारपेठांमधील बाह्य हस्तक्षेप यामुळे संपुष्टात येणार आहे. दलालांच्या विळख्यातून शेतकरी मुक्त होणार असून, ते आपला माल स्वत: किंमत ठरवून विकू शकणार आहेत. मात्र, यामुळे अनेकांच्या दुकानदार्‍या बंद होणार असल्याने, ते शेतकर्‍यांच्या मनात गोंधळ निर्माण करीत आहेत. मुळातच अस्तित्वात नसलेली भीती त्यांना दाखवत आहेत आणि शेतकरी त्यांच्या या जाळ्यात अडकले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

शेतकर्‍यांशी साधला संवाद
यावेळी पंतप्रधानांनी कच्छ जिल्ह्यातून आलेल्या शेतकर्‍यांशी संवाद साधला. यात कच्छ येथे स्थायिक झालेल्या पंजाबमधील शेतकर्‍यांचाही समावेश होता. शेतकर्‍यांनी या बैठकीत कृषी कायद्यांचे समर्थन करताना, हे कायदे रद्द केले जाऊ नये, अशी विनंती केली.

हायब्रिड अक्षय ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी
पंतप्रधानांनी येथे हायब्रिड अक्षय ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, यामुळे एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Tags: Agriculture Billकृषी कायदेपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

फास्टॅग; 1 जानेवारीपासून कठोर नियमांची अंमलबजावणी

Next Post

राष्ट्रीय महालोकअदालत संपन्न

RelatedPosts

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
Next Post
राष्ट्रीय महालोकअदालत संपन्न

राष्ट्रीय महालोकअदालत संपन्न

वंचित बहुजन आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा प्रश्नावर एक दिवशीय धरणे आंदोलन

वंचित बहुजन आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा प्रश्नावर एक दिवशीय धरणे आंदोलन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.