तेल्हारा : नविन ग्रंथालयाचे प्रस्ताव स्विकारण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसिल कार्यालय तेल्हारा मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे, ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आहे. ज्ञानामुळे माणुस ज्ञानवैभवसंपन्न होतो.ज्ञानाशिवाय जीवन अधुरे आहे.आणि त्याकरीता वाचन हे जीवनात महत्वाचे आहे.वाचनाने ज्ञानाची वाढ होते.आणि म्हणुन लोकांमध्ये वाचणाची गोडी निर्माण होण्यासाठी गाव तेथे ग्रंथालय असणे गरजेचे आहे.
अजुनही महाराष्ट्रात अशी कितीतरी गावे आहेत,की तेथे शासनमान्य ग्रंथालये नाहीत,आणि अशातच शासनाने सन 2011-12 पासुन नविन ग्रंथालयाचे प्रस्ताव स्विकारणे बंद केले आहे,ते आजपर्यंत बंदच आहे.आणि म्हणुन तेल्हारा तालुक्यातील ग्रंथप्रेमी, ग्रंथवाचक यांनी नविन ग्रंथालयाचे प्रस्ताव स्विकारणेबाबत तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
निवेदनावर संजय तायडे,आनंद बोदडे,अॅड.संदीप वानखडे,अमर भारसाकळे,श्रीराम मोहोड,विनोद सरदार,हिम्मत पोहरकार,पंकज भारसाकळे,सुधाकर वानखडे,सिध्दार्थ शिवणकार,विजय देशमुख,देवानंद इंगळे,भाष्कर तायडे, संजय बोदडे,यांच्या सह्या आहेत.