• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 28, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हे तुमचे सरकार,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 19, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

सोलापूर : राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वतः बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. हे शेतकऱ्यांचे सरकार असून तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच नेमकी किती मदत करायची याची माहिती सध्या गोळा करत आहे. सर्व माहिती उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना दिले. आज सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी ते बोलत होते.

“नेमकी मदत किती करावी, काय करावी ही माहिती आम्ही गोळा करत आहोत. शेतकऱ्यांना पुन्हा एकद सांगेन तुम्हाला कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. नाराज करणार नाही. हे शेतकऱ्यांचे सर्व जनतेचे सरकार आहे. त्यामुळे जे शक्य होईल ती मदत करू”, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच किती मदत करायची ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ मदत जाहीर करू. येत्या तीन-चार दिवसांतील दौऱ्यानंतर किती मदत करायची याचा साधारण अंदाज येईल. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधत शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे म्हणत विरोधकांनी ठाकरे सरकारकडे बोट केले. आपल्याला राजकारण करायचे नाही. पंरतु केंद्राकडे राज्याचे जे देणे बाकी आहे ते त्यांनी आम्हाला परत द्यावे. ती मदत आली तर केंद्र सरकारकडे आम्हाला हात पसरावे लागणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसह केंद्र सरकारलाही चिमटा काढला आहे.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगवी, अक्कलकोट येथील पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच ११ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यावेळी धनादेश देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलाआपले सरकार सत्तेत आल्यापासून अनेक संकटाना तोंड देत असून त्यावर आपण मात करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखवला. ना भूतो न भविष्यती अशी संकटे येत आहेत. आधी कोरोनाचे संकट आले. आता अतिवृष्टीचे संकट आले. संकटाचे डोंगर उभे राहत आहेत. पण संकटाचे हे डोंगर नक्की पार करू, शेतकऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करताना एक इशारा देखील दिला आहे. अतिवृष्टी होऊ नये ही प्राथर्ना करत आहे. पंचनामे सुरू आहेत. माहिती घेत असून त्याचा अभ्यास करत बसणार नाही. पाण्याचा अनपेक्षित लोंढा आला. ७० वर्षांनंतर प्रचंड पाणी आले. त्यामुळे पूर रेषा लक्षात ठेवून पुनर्वसन करू. अतिवृष्टीचा इशारा अजून कायम असून गाफील राहू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

Tags: शेतकऱ्यांना
Previous Post

घरकुल प्रकरणी तसेच विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांची सपत्नीक शेकडो लाभार्थ्यांसह आमरण उपोषणाला सुरवात …

Next Post

गाडेगाव सरपंच, उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव पारित!

RelatedPosts

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी
Featured

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन
Featured

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा
Featured

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

July 23, 2025
बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
Featured

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

July 23, 2025
तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली
Featured

तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली

July 21, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
Next Post
akola news

गाडेगाव सरपंच, उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव पारित!

परीक्षे

कोळी महासंघ बारुला विभाग यांच्या वतीने नीट परीक्षेत बाजी मारणाऱ्या दिव्या दंदे चा सत्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली

तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली

July 21, 2025
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

July 23, 2025
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.