• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, November 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हे तुमचे सरकार,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 19, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

सोलापूर : राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वतः बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. हे शेतकऱ्यांचे सरकार असून तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच नेमकी किती मदत करायची याची माहिती सध्या गोळा करत आहे. सर्व माहिती उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना दिले. आज सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी ते बोलत होते.

“नेमकी मदत किती करावी, काय करावी ही माहिती आम्ही गोळा करत आहोत. शेतकऱ्यांना पुन्हा एकद सांगेन तुम्हाला कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. नाराज करणार नाही. हे शेतकऱ्यांचे सर्व जनतेचे सरकार आहे. त्यामुळे जे शक्य होईल ती मदत करू”, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच किती मदत करायची ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ मदत जाहीर करू. येत्या तीन-चार दिवसांतील दौऱ्यानंतर किती मदत करायची याचा साधारण अंदाज येईल. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधत शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे म्हणत विरोधकांनी ठाकरे सरकारकडे बोट केले. आपल्याला राजकारण करायचे नाही. पंरतु केंद्राकडे राज्याचे जे देणे बाकी आहे ते त्यांनी आम्हाला परत द्यावे. ती मदत आली तर केंद्र सरकारकडे आम्हाला हात पसरावे लागणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसह केंद्र सरकारलाही चिमटा काढला आहे.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगवी, अक्कलकोट येथील पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच ११ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यावेळी धनादेश देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलाआपले सरकार सत्तेत आल्यापासून अनेक संकटाना तोंड देत असून त्यावर आपण मात करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखवला. ना भूतो न भविष्यती अशी संकटे येत आहेत. आधी कोरोनाचे संकट आले. आता अतिवृष्टीचे संकट आले. संकटाचे डोंगर उभे राहत आहेत. पण संकटाचे हे डोंगर नक्की पार करू, शेतकऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करताना एक इशारा देखील दिला आहे. अतिवृष्टी होऊ नये ही प्राथर्ना करत आहे. पंचनामे सुरू आहेत. माहिती घेत असून त्याचा अभ्यास करत बसणार नाही. पाण्याचा अनपेक्षित लोंढा आला. ७० वर्षांनंतर प्रचंड पाणी आले. त्यामुळे पूर रेषा लक्षात ठेवून पुनर्वसन करू. अतिवृष्टीचा इशारा अजून कायम असून गाफील राहू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

Tags: शेतकऱ्यांना
Previous Post

घरकुल प्रकरणी तसेच विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांची सपत्नीक शेकडो लाभार्थ्यांसह आमरण उपोषणाला सुरवात …

Next Post

गाडेगाव सरपंच, उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव पारित!

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम
Featured

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025
Next Post
akola news

गाडेगाव सरपंच, उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव पारित!

परीक्षे

कोळी महासंघ बारुला विभाग यांच्या वतीने नीट परीक्षेत बाजी मारणाऱ्या दिव्या दंदे चा सत्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.