अकोट (शिवा मगर)- चॅनल च्या व स्वतः च्या व्ययक्तिक प्रसिद्धिसाठी रिपब्लिक भारत न्यूज चॅनल चे संपादक अर्णब रंजन गोस्वामी हे आपल्या चॅनल च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार ला बदनाम करण्यासाठी सतत बिनबुडाचे तथ्यहीन आरोप करत आहेत.ज्यामधे प्रामुख्याने मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याविरुद्ध अपमानकारक बदनामीकारक अपशब्द वापरून जनसामन्यामधे राज्य सरकारप्रति द्वेष राग घृणा निर्माण करत आहेत हे केवळ विरोधकांचे राजकीय षडयंत्र आहे शिवसेना पक्ष व मा.उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांच्या विरुद्ध जर कोणी अपशब्द वापरून अश्या प्रकारचे बदनामीकारक कारस्थान रचत असेल तर शिवसैनिक कधीही स्वस्थ्य बसणार नाही.आज अकोट शहर पोलिस स्टेशन ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी शिवसैनिकांसमवेत रिपब्लिक भारत न्यूज चॅनल च्या संपादकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,युवासेना विस्तारक राहुल कराळे,शिवसेना तालुकाप्रमुख श्याम गावंडे,शहरप्रमुख सुनील रंधे,अमोल बदरखे,सुभाष सुरत्ने,कुणाल कुलट,अनिल जवंजाळ,पंकज गणभोज,रितेश बोरखडे,अक्षय घायल,रणजित कहार,विजय कांगळे,संजय भट्टी,प्रफुल बोरकुटे,प्रशांत बोरखडे,सागर कराळे,विश्राम गवते,जगदीश वानखडे,निलेश गौड,विजय भारसाकळे,सोपान पोहरे,रोहित जयस्वाल,बाबाराव ताडे यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.