अकोट(देवानंद खिरकर) – आकोट तालुक्यातील ग्राम पणज परीसरासह आकोट तालुक्यात पानपिंपरी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असुन या पिकाला शासनाने आजपर्यंत हि विमा संरक्षण लागु केला नाही.अनेक वेळा आम्ही शासन दरबारी पाठपुरावा केला. परंतु शासनाने या समस्येकडे शासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.या मुळे पान पिपरी ऊपादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.तरी शासनाने आमच्या पान पिपरी या पिकाला विमा संरक्षण लागु करावा हि शासना ला आमची विनंती आहे.पानपिंपरी ही औषधी
वनस्पती म्हणून ओळखले जाते. त्याची लागवड बारी समाज करतो यामध्ये निसर्गाचा समतोलपणा नैसर्गिक आपत्ती ऊन हवा वारा पाऊस यामध्ये पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. आणि शेतकरी हवालदिल होतो.अशा परिस्थितीमध्ये शासनाने पानंपिरीला विम्याचे संरक्षण दिले तर शेतकऱ्याला पानपिंपरी चे नुकसान झाल्यावर सुद्धा तो उभा कसा राहू शकेल त्याच कुटुंब कस चालेल यासाठी मदत होईल तर मी शासनाला विनंती करतो की पान पिंपरीला विम्याचे संरक्षण द्यावे.अशी माहिती शेतकरी गजानन हरीदास आकोटकर पणज यांनी दिली .