पातुर (सुनिल गाडगे): पातुर शहर व ग्रामीण मध्ये जल प्रधिकरण चे काम लोकांना पाणी पुरवण्याची आहे. सध्या स्थितीमध्ये पावसाळा असल्यामुळे पाण्याचा साठा हा कमी होऊ शकत नाही. तरीही सुद्धा जल प्राधिकरण चे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नानासाहेब नगर येथील पाण्याची समस्या पावसाळ्यात सुद्धा सुटत नाही या बाबीचे सर्वस्व कौतुक होत आहे. व अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. येथील नळ पाचव्या दिवशी फक्त दोन तास साठी सोडले जातात व त्या वेळामध्ये अर्धा ते पाऊण तास फक्त हवा येते तर पाणी येतच नाही आणि जर आले सुद्धा तर उरलेल्या वेळात लोकांचे पिण्याचे पाणी सुद्धा भरले जाऊ शकत नाही. अशा कठीण परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष न घातल्यास येथील नागरिक आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत.
__________
सागर रामेकर :
वारंवार संबंधित कर्मचारी यांना सुचविले असता तात्पुरते पाण्याची प्रेशर वाढविले जाते आणि पुढील नळ सोडतात तेव्हा परिस्थिती जशीच्या तशी होऊन जाते आतापर्यंत दहा ते बारा वेळा संबंधित कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तरीही परिस्थिती जशीच्या तशीच आहे आता संबंधित कार्यालयावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.