तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी शासनामार्फत राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे 25 मार्च पासून कोराणाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली,शासकीय- खाजगी कार्यालये,दुकाने हॉटेल्स,मार्केट, अनेक उद्योग-धंदे ज्यामुळे लोकांचा आपापसातील संपर्क कमी होईल अशाप्रकारे सर्व व्यवहार बंद करण्यात आले चार महिन्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनां मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थव्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे कोरोना विरुद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता अंदाजे 80 टक्के लोकांनी दाखविली आहे 15% लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोनाचा मुकाबला करण्यात पुर्णंता यशस्वी झाले आहेत 5% लोक Vulnerableआहेत हे अद्ययावत वैद्यकीय उपचार देऊनही नियंत्रणात आणता येत नाहीत वैद्यकीयदृष्ट्या गंभीर होत आहेत व बळी पडत आहेत सरकारने या 15% +5%= 20% लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत व कोरोना नियंत्रणच्या नियोजनाचे हे सूत्र ठरविले पाहिजे 100%लोकसंख्येवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत अर्थव्यवस्था संकटात आहे 80%पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागतो आहे गेल्या चार महिन्यांचा आढावा घेऊन सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच केलेली आहे कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विषयक सुरक्षतेचे नियम आहेत त्यांचे काटेकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करीत आहे एसटी,बेस्ट सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा, सरकारने त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे गणपती उत्सवासाठी खासगी बस वाहतुकीची बुकिंग सुरुवात झाली आहे खाजगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे? सरकारने एसटी बस व बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत परंतु त्या फारच अपुऱ्या आहेत सार्वजनिक वाहतूक सेवे अभावि लोकांची अतिशय गैरसोय होत आहे दुसरे म्हणजे सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुक्याच्या वतीने आज ता.12 बुधवार रोजी महापरिवहण आगार प्रमुख तेल्हारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले व डफडी बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी सैफउल्ला खा पठाण, सुभाष रौंदळे,अशोक दारोकर, विकास पवार, मिराताई पाचपोर जि.प.सदस्य, जिवन बोदडे, पंजाब तायडे, संदिप कांबळे, सचिन झापर्डे,अरविंद तिव्हाणे, हरिदास गवारगुरू, रोशन दारोकार, देविदास गावंडे,आम्रपाली गवारगुरू, कल्पना अरुण हिवराळे, भगवान हागे, राजीक शाह,अशोक अढाऊ, पुरूषोत्तम मानकर,मंगेश वरठे रक्षित बोदडे,सुदर्शन बोदडे, पंजाब दुसेकर,मिलिंद दांडगे, मोहन बावसकर परमेश्वर नागे, प्रल्हाद पाचपोर, संघर्ष बोदडे, लखन सोनटक्के, मिलिंद हिवराळे, अनिल तायडे, प्रमोद चव्हाण, आकाश जसनापुरे, प्रशांत गावत्रे, निखिल हिवराळे,राजेश पोहरकार, अजय पोहरकार, अविनाश पोहरकार,गजानन सुशीर,प्रताप गव्हांदे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
तर हिवरखेड येथे बसस्थानकासमोर वंचितच्या पदाधिकऱ्यांनी आंदोलन केले, या आंदोलनामध्ये भारिपचे मा.ता.अध्यक्ष प्रकाशजी खोब्रागडे, पं.स. गटनेते प्रा. संजय हिवराळे, जि.सदस्या सौ. दिपमालाताई दामदर, सौ. प्रमोदीनीताई कोल्हे, सौ.माधुरीताई हिवराळे,ता. उपाध्यक्ष महिला आघाडी,सौ.कुसुमबाई विरघट मो.इद्रीस पं.स. सदस्य, शांताराम कवळकार, संदिप इंगळे, नरेश बांगर, गोपाल विरघट ,
हिपाजतभाई, विनोद भोपळे, मोईज जमादार, सुशिल इंगळे,रतन दांडगे, सचिन वाघ, शुभम अंदुरकर, यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी,सम्यक विद्यार्थीआंदोलनाचे पदाधिकारि उपस्थीत होते.