मूर्तीजापुर (सुमित सोनोने)- केंद्र शासनाने सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना मारामारी च्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना मोफत तांदूळ देण्याची योजना राबवली गेली परंतु या महिन्यात पूर्ण महिना निघत आहे. तरीपण या गोरगरिबांना त्याला मिळाला नाही स्थानिक व जिल्हा प्रशासनाने याबद्दल त्वरित दखल घेऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजना अंतर्गत गरिबांना धन्य द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला यांनी केलेली आहे.
मागील चार ते पाच महिन्यांपासून सतत लाॅकडाऊन करण्यात आले आहे.या परिस्थितीत अनेक मजुरांना हाताला काम नाही. शासनाने यापूर्वी या गोरगरिबांना रेशन कार्ड मार्फत मोफत तांदूळ दिले आहे फक्त तांदुळाने पोटाची खळगी बुजणार नाही.त्याचबरोबर शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्फत निकृष्ट दर्जाची तूर डाळ आणि चना दाळ दिली आहे.तरी अनेकांनी ही दाळ खाल्ली,आत तरी शासनाने तेल साखर, सुद्धा या गोरगरिबांना द्यावे मूर्तिजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानदार आहे.यांच्या मार्फत मिळणारे धान्य आतापर्यंत वाटप करण्यात आलेला नाही. यंदा शासनाने तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ पर व्यक्ती देण्याचा ठरविले आहे.या गोरगरिबांना सदर योजनेचा लाभ मिळावा याकरिता मोफत मिळणाऱ्या धान्य त्वरित वितरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला यांनी केली आहे.