बोर्डी(देवानंद खिरकर)-पंढरीनाथाचे दर्शनार्थ जाणार्या विदर्भातील कौडण्यपुर रुख्मीणी आईचे पालखीसह परंपरेतल्या पालख्यांना पंढरपुर आषाढी वारीला शासनाने परवानगी द्यावी अशी जोरदार मागणी युवा वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.यावर्षी कोरोनाच्या पादुर्भावामुळे पायदळ दिंडी सोहळा हा रद्द आहे आणि शासनाने मानाच्या सहा पालख्यांना हेलिकॉप्टर किवा विमानाने किवा वाहनाने प्रशासनातर्फे पंढरपूरला पालखीतील पादूका व काही वारकरी नेण्याची परवानगी दिली आहे.या निर्णयाचे वारकरी भावीकांनि समाधान व्यक्त केले आहे.परंतू सहा पालख्यामधे विदर्भातील एकही पालखीचा नामऊद्देश केलेला नाही.त्यामूळे विदर्भातील वारकरी मंडळीमधे तिव्र नाराजीचा सुर आहे.प्रामूख्याने विदर्भातील कौडण्यपुर येथिल रुख्मीणी माता यांची पालखी जर पंढरपुरला दाखल झाली नाही तर पांडूरंगाचे दर्शन सुध्दा अपूर्ण मानावे लागेल असा वारकर्याचा भाव आहे.दरवर्षी पोर्णीमेच्या दिवसाला रुख्मीणी मातेची पालखी पांडूरंगाच्या मंदिरात वीणा मंडपामधे नेण्यात येत असते.आणि भगवंतातर्फे आई रुख्मीणी मातेला साडी चोळी देऊन बोळवण करण्यात येते. व त्या नंतर आई रुख्मिणी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ नेण्यात येतात.व भगवंताचे दर्शन करुण देण्यात येते.त्याचप्रमाणे रुख्मीणी माता संस्थान कौडण्यपूर मठ पंढरपुर येथिल मठातून दररोज पांडूरंगाला नैवद्यसुध्दा देण्यात येते.या सर्व परंपरा 425 वर्षापासुन चालू आहे.या परंपरेला खंड पडू नये या करिता युवा विश्व वारकरी सेना तर्फे प्रशासनाला विनंती करतो की विदर्भातील फक्त पाच पालख्या प्रत्येक पालखी सोबत पाच वारकरी विमानाने किवा एसटी बसने पंढरपुरला नेण्यात यावे.पंढरपुरला येणार्या पालख्या मधिल फक्त 25 वाकरी सोशाल डिस्टसिंग नियमाचे पालन करुन वारी पूर्ण होईल.ही परंपरा खंडीत होवू नये.त्यासाठी परंपरेतिल पाच पालख्यावर रुख्मीणी माता संस्थान कौडण्यपुर,संत श्री गुलाब महाराज (माधाम)भक्तीधाम,श्री क्षेत्र चांदुरबाजार जी अमरावती,संत भास्कर महाराज संस्थान,संत वासुदेव महाराज संस्थान अकोट,संत शीवराम महाराज संस्थान वरुळ जऊळका या पाच संताचे पालख्यांना शासनाने परवानगी द्यावी.जर आम्हाला परवानगी दिली नाही तर युवा विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी पाच पालख्याच्या पादुका आमच्या वाहनाने पालख्या आणणारच त्या करीता विदर्भातील सर्व वारकरीच्या भावनेचा विचार करुण पंढरपूर वारी करीता परवानगी द्यावी.अशा आसयाचे निवेदन युवा वारकरी सेनेद्वारा मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,श्री क्षेत्र पंढरपूर ऑफिस,आमदार नाना भाळके,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुर,विभागिय आयुक्त अमरावती,पालकमंत्री यशोमती ठाकुर अमरावती,पालकमंत्री बच्चू कडू अकोला,यांना पाठवीले असल्याची माहीती ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांनी दिली.