तेल्हारा (प्रतिनिधी)- भारतीय जैन संघटनेच्या ( बिजेएस ) च्या माध्यमातुन प्रशासनाच्या समन्वयाने जेशिबी मशिनच्या साहय्याने तेल्हारा तालुक्यामध्ये जलसंधारनाची कामे बर्याच दिवसापासुन चालु आहेत. यामध्ये बिजेएसचा अर्थात भारतीय जैन संघटनेचा जलसंधारनाचा दुरगामी ऊद्देश अभिनंदनिय आहे. पण तेल्हारा तालुक्यामध्ये भारतीय जैन संघटनेच्या जलसंधारनाच्या कार्यामध्ये लाखों रुपयांचा अपहार झाल्या बाबतचे निवेदन तहसीलदार तेल्हारा यांना देण्यात आले आहे.
तेल्हारा तालुक्यातील वडगांव रोठे, वाकोडी या गावासह अनेक गावात भारतीय जैन संघटनेच्या वतीने जलसंधारनाचे कामे चालु आहेत. ही कामे करत असतांना संघटनेच्या धोरणांप्रमाने शेतकर्यांनी जैन संघटनेच्या जेशीबी मशिनमध्ये डीजेल टाकुन आपआपल्या शेतात जलसंधारनाची कामे शेतकर्यांनी करावी हे जैन संघटनेला अपेक्षित आहे. परंतु वडगांव रोठे आणि वाकोडी येथिल काही शेतर्यांकडुन जलसंधारनाच्या कामाचे 800 रुपये ते 850 रूपये प्रत्येकी घंट्याचे पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या धोरनांना हरताळ फासण्याचे काम आणि गोरगरीब गरजु शेतकर्यांना लुटण्याचे काम भारतिय जैन संघटनेचा कर्मचारी हा करीत आहे. भारतिय जैन संटनेने डीजल टाका आणि जलसंधारनाच्या कामांवर जेशिबी मशिन शेतकर्यांनी वापरा या तत्वावर ऊपलब्द करुन दिलेली आहे पण हा संबंधित कर्मचारी आपली आर्थिक पिळवणुक करत आहे हे शेतकर्यांच्या लक्षात आल्यावर सदर पिडीत शेतकरी सदर कर्मचाऱ्यारी यांना आपण दिलेले पैसे परत मागण्यासाठी पिडीत शेतकरी गेले असता आता मी तुमचे घेतलेले पैसे तुम्हाला परत वापस देत नाही तुम्हाला माझी तक्रार जिथे करायची आहे तिथे करा मी वरपासुन खालपर्यंत सर्वांना हप्ते देत आहोत तुमच्याच्याने माझे काहीच वाकडे होत नाही. असे म्हणुन संबंधित पिडीत शेतकर्यांना दमदाटी केली.
तरी आदीच कोविड 19 मुळे आर्थिक संकटात आलेल्या शेतकर्यांवर अशा प्रकारचा अन्याय करणार्या भारतीय जैन संघटनेच्या संबंधित कर्मच्यारी आकाश गायगोळ याच्यावर योग्यती कार्यवाही करुण, शेतकर्यांकडुण लुटलेले पैसे शेतकर्यांना परत करण्यात यावे अशी मागणी – चंदु बोरसे आणि समस्त पिडीत शेतकरी बांधव…यांनी तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन देऊन केली आहे.