अकोला (प्रतिनिधी)- अकोलेकर जनतेचा अपमान करण्याचा प्रकार कोणी करू नये जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग यांचा आपसात समन्वय असणे तसेच उपाययोजना करण्यास पेक्षा स्वतःची प्रसिद्धी करण्यात कागदोपत्री कार्य करण्यात अधिकारीवर्ग गुंग असल्यामुळे covid-19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी अकोलेकरांना दोष देण्याचे ऐवजी प्रशासनावर आपली पकड मजबूत करावी असा सल्ला आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला.
शासन शासनाचे अधिकारी आदेश जर ऐकत नसेल ही दुर्देवी बाब असल्याची प्रतिक्रिया अकोला चे आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली अकोलेकर हे संयमशील व सर्व कामांमध्ये सहकार्य करणाऱ्या असून पोलीस प्रशासन आरोग्य विभाग व महसूल विभाग मनपा प्रशासन एकत्र येऊन कार्य करत नाही तोपर्यंत याचा प्रादुर्भाव सहमत नाही रोज तासात निर्णय बदलणे हा नियम प्रशासनाचा झाला आहे हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नाही कृषी विद्यापीठ भागांमध्ये योग्य ती व्यवस्था नाही नियोजन नाही त्यामुळे रुग्णांमध्ये दहशतीचं वातावरण असून शासनाचे पैसे कुठे खर्च होत आहे याचा पत्ता लागत नाही यंत्रणा असताना त्यांच्याकडून काम करून घेण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.
जनता कर्फ्यू जनतेची साथ का मिळाली नाही याची चिंतन करण्याची गरज आहे मनन करून यासंदर्भात उपाययोजना करू अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची गरज आहे यासाठी नोडल ऑफिसर राज्य शासनाने नियुक्त करावा तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये जागा भरून त्वरित सुरू करण्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शासनाकडे यासाठी दबाव निर्माण करावा व अकोलेकरांना योग्य सेवा अधिकारी देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निर्णय घ्यावा पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन आरोग्य प्रशासन केवळ गप्पांचा अड्डा झाला आहे वृत्तपत्र वृत्तपत्र लोकप्रतिनिधी वारंवार या विषयावर सूचना देत असताना सुद्धा त्यावर अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरत आहे याचासुद्धा विचार करून निर्णय घेऊन जनतेमध्ये विश्वास निर्माण करून covid-19 चा प्रादुर्भाव वाढणार नाही यादृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली