• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 5, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सद्याच्या घडीला जनतेने “जनता कर्फ्यू” निर्माण करण्याची गरज

City Reporter by City Reporter
May 28, 2020
in Featured, राष्ट्रीय, संपादकीय
Reading Time: 1 min read
1.4k 15
1
janta-curfew-
236
SHARES
10.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

कोविड- 19 अर्थात कोरोनाचे संपूर्ण जगावर मोठे संकट कोसळलेले असतांना भारतात देखील प्रशासना कडून सोशल डिस्टन्स चे अवाहन वारंवार करण्यात येत आहे. भारतात कोरोना बाधितांची नगण्य संख्या असतांना लॉकडाउनच्या सुरवातीलाच ‘जनता कर्फ्यू’ चा ट्रेलर झाला नंतर लॉकडाऊन झाले तरी देखील काही बेजबाबदार लोकांनी जीवनावश्यकच्या नावाखाली अनावश्यक भटकंती केली हे मान्यच करावे लागेल.मात्र आता परिस्थिती पूर्वी सारखी राहिलेली नाही दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा कहर वाढत असून दररोज हजारच्या पटीने वाढ होतांना दिसत आहे.त्यामळे आता खऱ्या अर्थाने ‘जनता कर्फ्यू’ ची आवश्यकता आहे.

जगात स्वतःला महासत्ता समजणाऱ्या देशांनी कोरोना संकटाच्या समोर गुढगे टेकवल्याचे आपण पाहत आहोत.उत्तम अशी आरोग्य यंत्रणा या देशांकडे आहे तरी देखील एका व्हायरस समोर हतबल होतानांचे चित्र संपूर्ण जग पाहत आहे.महामारीत शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यावर आपण आपल्या देशात सामान्य नागरिकांचे काय हाल झाले व होत आहे हे पाहत आहोत.यापुढेही बेजबाबदार लोकांच्या नाकर्तेपणामुळे कोरोना संसर्ग वाढत राहिला आणि शासनाने लॉकडाऊन वाढविला तर यात आपल्या देशाचे सर्वच स्तरातून मोठे नुकसान होऊ शकते हे नाकारता येणार नाही.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

देशातील गरीब जनता जी रोज कमावून आपल्या दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करते त्या जनतेचे हाल काय असतील याचे चित्र डोळ्या समोर उभे राहिले तरी अंगावर काटे उभे राहतात.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तीन चार दिवसातच सामाजिक संस्था,प्रशासनाला पुढे येऊन गरजूंची भूक भागवावी लागली अशी परिस्थिती असतांना अजून किती दिवस लॉकडाऊनचा सामना करावा लागेल असा प्रश्न मनात घेऊन सामान्य नागरिक एक एक दिवस काढत आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने शासनाची लॉकडाऊन,’जनता कर्फ्यू’ आवाहन करणे आवश्यता होऊ लागली आहे. शासनाकडून लॉकडाऊन बाबत “तारीख पे तारीख” मिळाल्यास आपलेच नुकसान आहे.म्हणूनच कोरोनाची साखळी तोडायची असेल तर ते शासनाच्या हातात नसून या देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या हातात आहे.आपणच कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला हद्दपार करू शकतो त्यानंतर आपोआप लॉकडाऊन,’जनता कर्फ्यू’ यातून आपली सुटका होईल. भारतीय नागरिकांना संविधानाने जसे अधिकार दिले आहेत त्याच प्रमाणे कर्तव्य देखील दिले आहे.आज पर्यंत आपण अधिकार गाजवले आहे पण आता वेळ कर्तव्य निभवायची आहे.

आपण आता आपले कर्तव्य म्हणून शासनाने आपल्या भल्यासाठी दिलेले दिशा निर्देश पाळून व अकोल्यातुन कोरोना हद्दपार होईपर्यंत स्वतःला ‘जनता कर्फ्यू’ लागू करेल तसेच खरोखर आवश्यक गोष्टीसाठीच घरा बाहेर पडेल अशीच मनाशी खूणगाठ बांधणे आवश्यक आहे तरच आपण ही कोरोना सोबतची लढाई जिंकणार आहोत.

अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या आता जलद गतीने वाढत आहे हे आपण रोज पाहत आहोत त्यामुळे अकोलकर खऱ्या अर्थाने आता ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याची गरज आहे.
‘जनता कर्फ्यू’ पाळूया..!
कोरोना लढा जिंकूया..!

निलेश र जवकार
(मुख्य संपादक)
९९२२३९०३०८

Tags: real janta curfew
Previous Post

हमी भाव खरेदी, कापूस खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक

Next Post

तेल्हारा तालूक्यात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीस विलंब,शामशिल भोपाळेनी दिले महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत निवेदन

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
सद्याच्या घडीला जनतेने “जनता कर्फ्यू” निर्माण करण्याची गरज

तेल्हारा तालूक्यात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीस विलंब,शामशिल भोपाळेनी दिले महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत निवेदन

leopard

विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुटकेची प्रतीक्षा

Comments 1

  1. Ravi says:
    5 years ago

    Sir kahi kamacha nahi hai he लाँकडाउन karan aaplya akola t
    zati wad khup hai

    Reply

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.