बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळातिल रामापूर येथे अवकाळी पाऊस व गारपीटीमूळे झालेल्या आंबीया संत्रा बहार पिकांचा पालकमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेऊन तात्काळ सर्वेचे आदेश दिल्या वरुन आज रामापूर येथे कृषी सहायक ठाकरे, धांडे साहेब, सरपंच गजानन डाफ़े यांनी नुकसानीची केली पाहणी. यामधे संत्रा, टरबूज, कांदा, आदी पिकांचा समावेश आहे. यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
अधिक वाचा: सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार