हिवरखेड (धिरज बजाज)- फक्त थोडावेळ पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या हिवरखेड तेल्हारा ह्या राज्य मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे अनेक वाहने फसण्याचे प्रकार पाहण्यास मिळाले. सध्या लॉक डाऊन मुळे वाहतूक बऱ्याच प्रमाणात बंद असली तरी जीवनावश्यक सेवा आणि शेतकऱ्यांना आपले घर ते शेती गाठण्यासाठी आणि शेतमालाची ने-आण करण्यासाठी ये-जा करावीच लागते. गुरुवार 14 मे रोजी दुपारी पडलेल्या थोड्याशा पावसामुळेच मुख्य रस्त्यावर चिखलच चिखल साचल्यामुळे हा राज्य मार्ग आहे की पांदण रस्ता आहे हे सुद्धा समजेनासे झाले होते.
शेकडो शेतकऱ्यांच्या मोटरसायकली चिखलात अडकल्यामुळे त्यांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले होते. आणि शेतकऱ्यांना आणि जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या शक्तींना चिखलात माखलेली वाहने काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
हा मार्ग अनेक महिन्यांपासून रखडलेल्या असल्याने लॉकडाऊन काळात कमी वाहतुकीच्या वेळी या रस्त्याचे काम ताबडतोब पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
अधिक वाचा: सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार