औरंगाबाद: लॉकडाऊन काळाल जालनात अडकून पडलेल्या मजूरांवर शुक्रवारी पहाटे काळाने घाला घातला. जालनातील एसआरजे या स्टील कंपनीत कामाला असलेले २१ मजूर मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी रात्री रेल्वेरुळावरून औरंगाबादकडे निघाले होते. काही किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर थकेलेले हे मजूर पहाटे औरंगाबाद-जालना मार्गावरील रेल्वेरुळावर विश्रांती घेत असतानाच औंरगाबादकडे येणाऱ्या रिकाम्या मालगाडीखाली मजूर चिरडले गेले. या अपघातात १६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
Extremely anguished by the loss of lives due to the rail accident in Aurangabad, Maharashtra. Have spoken to Railway Minister Shri Piyush Goyal and he is closely monitoring the situation. All possible assistance required is being provided.
— Narendra Modi (@narendramodi) May 8, 2020
दरम्यान या प्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी मृतांच्या नातेवाईकांना तातडीने पाच लाखांची मदत जाहीर केली असून मृत मजूरांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचे एक उच्चपदस्थ अधिकारी मंडळ विमानाने औरंगाबाद येथे दुपारपर्यंत दाखल होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
During early hours today after seeing some labourers on track, loco pilot of goods train tried to stop the train but eventually hit them between Badnapur and Karmad stations in Parbhani-Manmad section
Injureds have been taken to Aurangabad Civil Hospital.
Inquiry has been ordered— Ministry of Railways (@RailMinIndia) May 8, 2020
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, सदरील घटना बदनापुर आणि करमाड स्टेशन दरम्यान घडली आहे. हा विभाग रेल्वेच्या परभणी-मनमाड सेक्शनमध्ये येतो. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही मजुर रेल्वे रुळावर झोपले होते. मालगाडी चालकाने त्यांना पाहिले होते, वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, पण घटना घडली. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
करमाड पोलिसांनी सांगितले की, मजुर जालन्याहून भुसावळकडे जात होते. आपल्या राज्यात जाण्यासाठी त्यांना तेथून रेल्वे पकडायची होती. मजुर रेल्वे रुळाच्या मार्गाने जात होते. थकल्यानंतर ते रुळावरच झोपले. शुक्रवारी सकाळी सव्वा पाच वाजता मालगाडीखाली चिरडले गेले.