तुलंगा बु(मुकेश हातोले)– आज मानवता पूर्ण पणे लोप पावत चाललेल्या जगात काही व्यक्तिमधे मानवता आणि सेवाभाव अजूनही शिल्लक आहे याची ते वेळोवेळी सुप्रचीती देत राहतात. यातीलचं एक उदाहरण म्हणजे अकोला येथील अकोली बु. स्थित रहिवाशी, CRPF जवान संदीप भिमराव खंडारे यांचं, संदीप भिमराव खंडारे हे मध्यम वर्गीय परिवारा मधिल असुन ते सध्या दिल्ली येथे CRPF मध्ये सेवा देत आहेत.
देशात कोरोना सारखं गंभीर कठिन संकटा मधे ते आपली ड्यूटी करुनही मिळालेल्या खाली वेळात आपल्या ड्यूटी व्यतीरीक्त रोज आश्रितांना अन्न व गरजू वस्तूंचं वाटप,गरजू लोकांना हवी ती मदत आपल्या स्वखर्चाने करत आहेत,तसेच आपलेे मित्र व परिवारा मार्फत ते अकोला येथील अकोली बु. परिसरातील गरजू गरीब परिवाराची शक्य होइल ती मदत करत आहेत. जगावर कोरोना सारखं गंभीर संकट उभं असताना एक सामाजिक जाण म्हणून त्याच्या पगारातील एका महीन्यातील एक दिवस या प्रमाणे 1वर्षा साठी प्रधानमंत्री रिलीफ फण्ड मधे छोटस योगदान म्हणून पगार देन्याची त्यानी वेवस्था केली आहे. या पूर्वीहि अनाथ आश्रम,वृद्ध आश्रम, कुपोषित बालकांना व पूरग्रस्त भागातील लोकांसाठी निधी देणं त्यांचा कडून चालूच रहते.छोट्याशा योगदानाने जर कुणाच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान येत असेल तर तेच आपली सर्वात मोठी कमाई आहे असे ते सांगतात.
केंद्र सरकार व राज्य सरकार ही आपल्या गरीब व गरजू जनतेची खुप मदत करत असुन योग्य ती पावले उचलत आहेत. त्याच बरोबर आपनही आपले प्रथम कर्त्तव्य समजुन कोरोना संकटा मधे मदतीचा हात द्यायला पुढं यायला हवं. त्याच प्रमाने सर्व सधन समाज बांधवांनी गरजू जनतेला शक्य होईल तेवढी मदत करण्याचे नम्र आवाहन केले आहे, कारण आज गरीब जनतेला काम नाही पैशे नाही 38 दिवसापासून घरी ताटकळत बसलेलं असल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे हाच मदतीचा योग्य काळ आहे. ही वेळ फक्त मदत द्यायची आहे. मदत करताना फोटो काढन्याची नहीं,असे ते नम्र आवाहन करत आहेत. खरंच या जवानाचं कौतुक कराव तेवढं कमी आहे आणि सधन बांधवानी यातून प्रेरणा घेऊन गरजूंना मदत करावी अशी ते विनवणी करत आहेत. सलाम यांच्या कार्याला आणि समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेला…
अधिक वाचा: मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला;निवडणूक आयोगाची परवानगी