अकोला : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असल्याने दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा विषाणून हा संसर्गाने पसरत असल्याने गर्दी टाळणे हा यावर एकमेव उपाय आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी २१ दिवसाचे देशात लॉकडाउुन घोषित केले आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरासह ग्रामीण भागात कोरोना संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु या बंदी दरम्यानही ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांचे घोळके जमा झालेले तसेच गावागावात जुगाराच्या नावाखाली एका ठिकाणी ५ पेक्षा अधिक नागरिक जमा होत असल्याचे तर शहरातील दारूदुकाने बंद असल्याने अनेक गावातील व्यसनाधिन नागरिक दुसछया गावात दाखल होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कोरोना संचारबंदी ही नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी व एकमेकाचा एकमेकाशी थेट संपर्क येऊ नये म्हणून जाहीर करण्यात आली. परंतु गा्रमीण भागात आरोग्य विभाग, महसुल विभाग, पोलीस विभाग व स्थानिक ग्रा.पं. प्रशासन यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करूनही नागरिकांकडून कोरोना संचारबंदीची एैशीतैशी केल्या जात आहे. या संदर्भात तेलहरा पो.स्टे. चे ठाणेदार विकास देवरे यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक गावात पोलीस पोहचू शकत नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली. तर ग्रामसेवक , तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील व स्थानिक सरपंच यांची एक बाहेर देशातून व बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्याची व त्याची माहिती प्रशासनास सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात यातील एकही अधिकारी आपल्या मुख्यालयी हजर राहत नसल्याचे भिषण वास्तव दिसत आहे.