अकोला(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार मध्ये असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू याना राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अकोला पालकमंत्री पदाची धुरा दिली.
अचलपूर मतदारसंघातुन आमदार म्हणून निवडून आलेले प्रहारचे बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठींबा देत सरकार मध्ये सामील झाले.त्यानंतर ठाकरे सरकार स्थापन होताच त्यांना राज्यमंत्री पदाची धुरा दिली. त्यानंतर सरकारने आज सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद निश्चित केले असून अकोला जिल्ह्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्याकडे देण्यात आली आहे.पालकमंत्री पद मिळाल्याने जिल्ह्यात प्रहारचे संघटन वाढणार आहे. बच्चू कडू यांच्या निवडीने प्रहार च्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.