अकोट(देवानंद खिरकर)- गेल्या आठवडया पासून सुरु असलेल्या अकोट तालुक्यातील शेतकर्यान्च्या विविध मागण्या जसे गेल्या वर्षीच्या संत्रा व केळी पिकवीमा मागिल महिन्यात झालेली अतिवृष्टी मधे शेतकर्याचे अतोनात नुकसान व त्यामधून संत्रा आनी केळी ही फळ पिके वगळन्यात आली होती.याच संधर्भात अकोट तालुक्यातील शेतकर्यांनी अकोट तहसिल येथे निवेदन सादर केले होते.यामधे उमरा मंडळ,अकोलखेड मंडळ,पणज मंडळ या तिन्ही मंडळातील 2019,20 वर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या फळबाग व पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,त्यामूळे या तिन्ही मंडळातील शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहे.यामधे सुरुवातीला महसूल व कृषी विभागाचे सयुक्तपने पंचनामे सुधा झालेले आहेत.परंतू अद्याप परंतही कुठलीही मदत शेतकर्यांना मिळालेली नाही.
शेतकर्यांना या मदती पासून वगळन्यात आलेले आहे.त्यामूळे सर्व फळबाग शेतकर्याचे संत्रा व केळी या पिकांचे नुकसान झालेले आहे.त्यामुळे या शेतकर्यांना पात्र लाभार्थी म्हणून यांची निवड करण्यात येवून यांना आर्थीक मदत मिळन्यात यावी.अशी मागणी अकोट तालुक्यातील सर्व फळबाग शेतकर्यांनी अकोला येथे जावून जिल्हा कृषी अधिकारी यांना रितसर निवेदन द्वारे आमदार नितीन बाप्पू देशमूख बाळापूर व शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकर्याच्या उपस्थितीत देण्यात आले त्यामूळे याप्रकरणात आज मध्यस्थी करुन जिल्हा कृषी अधिकारी वाघ अकोला,तालुका कृषी अधिकारी चौहान यांनी शेतकर्यांना न्याय मिळन्याकरिता आज दि.4/12/2019 ला कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे मिन्टीग घेवुन सर्व शेतकर्याचे म्हणने एकून त्यांचे सात्वन केले.तसेच 2018 संत्रा मृग बहार व केळी पिकविमा क्लेम अद्याप परंत बर्याच शेतकर्यांना मिळाला नाही.आनी अकोलखेड व पनज मंडळाच्या सर्व शेतकर्यांना केळीचा अर्धवट रक्कम मिळाली तोही विषय रेटून धरला.
त्यावेळेस प्रामुख्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे,शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे,प्रभाकर मानकर,छोटू कराळे,गणेश मानकर,प्रदिप ठाकर,अविनाश गावंडे,रामदास मांडवे,विजय भारसाकळे,धीरज ढोने,वैभव आतकड,देवानंद खिरकर,शुभम गावंडे,प्रल्हाद बुंदे, प्रमोद ठाकरे,राजू राऊत,दिपक खिरकर,श्रीकांत चेडे,राजू रहाने,बंटी पाडे,नानेश्वर ढोले,दिपक सरपे,यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.