वाडेगाव(डॉ शेख चांद)- मानसाला प्रगती करायची असेल तर शिक्षण अनिवार्य आहे मात्र हे शिक्षण घेण्यासाठी इंदिंरा नगरातील विद्यार्थ्यांना अनेक समस्येला तोंड देत नदीतुन चक्क डोंग्याच्या साहयाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने शासनाच्या विविध योजना ह्या कुणासाठी असा प्रश्र् उपस्थित केलेल्या जात आहे.
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव जवळून वाहणाऱ्या निर्गुणा नदीपलीकडुन इंदिरानगर असून तेथील नागरिकांना दळणवळणासाठी तसेच शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दैनदिन वाडेगावात जाणे येणे करावे लागते दरम्यान येथील कोल्हापुरी बांधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे नदीपात्र पाण्याने तुडुंब भरले आहे तसेच इंदिरानगराला जोडणाऱ्या या रस्त्यावर पुल नसल्याने तेथील नागरिकांसह जवळपास ३०० ते ३५० प्राथमिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाण्यातून डोंग्याच्या साह्याने जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे दरम्यान काही दिवसापूर्वी एक शेतमजूर नदी ओलांडून इंदिरानगर येथे जात असतांना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना ताजी असतांना या नदीपात्रातून विद्यार्थी डोंग्यातून जीवघेणा प्रवास करीत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाडेगावातील पाण्याची समस्या कठीण आहे त्यामुळे कोल्हापुरी बांधाऱ्यात पाणी अडविल्या गेलेच पाहिजे परंतु त्यापूर्वी येथिल नागरिकांसह विद्यार्थ्यांना जाण्यायेण्या साठी पर्यायी रस्ता करून द्यावा असे येथील पालक वर्गाचे म्हणने आहे.
मागील अनेक वर्षापासून वाडेगावपासून इंदिरानगराला जोडणाऱ्या रस्त्यावरील निर्गुणा नदीवर पूल बांधून द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित प्रशासनाला आणखी किती बळी हवेत असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे तरी संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निगृना नदीवर पूल बांधून इंदीरानगरातील नागरिकांसह विद्यार्थ्याचा प्रवास सुखकर करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे