• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, September 19, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले ! २१ ऑक्टोबरला मतदान २४ ला निकाल

City Reporter by City Reporter
May 13, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
निवडणूक आयोग

निवडणूक आयोग

12
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: अखेर आज राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले.केंद्रिय निवडणुक आयोगाने आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. राज्यातील २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली आहे. संपूर्ण राज्यासाठी एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे.त्यामुळे निवडणुकीसाठी आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसोबत साता-यातील लोकसभेची पोटनिवडणुक होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत ८ नोव्हेंबरला संपत असल्यामुळे महाराष्ट्र आता १३ व्या विधानसभेला निरोप देऊन १४ व्या विधानसभेला सामोरे जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. अखेर त्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात विधानसभेसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान, तर २४ ऑक्टेबरला मतमोजणी होणार आहे. संपूर्ण राज्यासाठी एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. ४ ऑक्टेबर ही अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होऊन दिवाळीपूर्वी म्हणजे २४ तारखेला निकाल लागणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसोबत साता-यामध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार नाही. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना येत्या २७ सप्टेंबरला जारी केली जाणार असल्याने दिवाळीपूर्वी राज्यात नवे सरकार येईल.

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

राज्यात विधानसभेसाठी ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुक खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून असणार आहे, तसेच २७ सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपले अर्ज भरताना संपूर्ण रकाने भरणे बंधनकारक आहे असेही सुनिल अरोरा म्हणाले. तसेच मतदार याद्यांमध्ये होणारा घोळ टाळण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत मतदारांची नोंदणी केली जाणार असून यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दहा लाख मतदारांची वाढ झाली असल्याचे निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते.निवडणूक आयोगाने १५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम राबवला होता. यातून ही माहिती पुढे आली आहे. निवडणूक आयोग नियमितपणे मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेत असते. यानुसार राबवलेल्या उपक्रमात ऑगस्टअखेर ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ इतके पात्र मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला दहा लाखांपेक्षा जास्त मतदारांची संख्या झाली आहे. यात चार कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष तर चार कोटी २७ लाख पाच हजार ७७७ लाख महिला मतदार आहेत. २५९३ तृतीय पंथी मतदार आहेत.या निवडणुकीच्या मतदानासाठी सुमारे १ लाख ८ हजार मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे.

२०१४ मध्ये विधानसभेसाठी १५ ऑक्टोबर २०१४ रोजी राज्यामध्ये एकाच फेरीत मतदान घेतले गेले होते. ह्या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेस ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम: 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत – 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर

छाननी – 5 ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख – 7 ऑक्टोबर

मतदान – 21 ऑक्टोबर

निवडणूक निकाल 24 ऑक्टोबर

आजपासून राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू

राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्यात निवडणूक

राज्यात 8 कोटी 94 लाख मतदार

महाराष्ट्रात 1.8 लाख ईव्हीएमचा वापर

Tags: मतदानमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकविधानसभा निवडणुकविधानसभा निवडणुक 2019
Previous Post

आज होणार निवडणुकीच्या तारखा जाहीर! निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Next Post

अखेर युतीचा फॉर्म्युला ठरला, मात्र शिक्कामोर्तब बाकी!

RelatedPosts

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’
Featured

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Next Post
भाजप – शिवसेना

अखेर युतीचा फॉर्म्युला ठरला, मात्र शिक्कामोर्तब बाकी!

कीटकनाशके फवारणी

कृषी विभाग व आत्मा समिती अंतर्गत कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची दक्षता कार्यशाळा संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.