• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 11, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्रातील पहिल्या विधानसभेच्या निवडणुक महासंग्रामचा मागोवा

City Reporter by City Reporter
May 13, 2020
in Featured, राज्य, राष्ट्रीय, संपादकीय
Reading Time: 1 min read
79 1
2
vidhansabha 2019
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

1 मे 1960 रोजी मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण, त्याआधी संयुक्‍त महाराष्ट्राच्या लढ्याने सारे राज्य ढवळून निघाले. स्वातंत्र्य लढ्यानंतर एवढे मोठे आंदोलन प्रथमच झाले.

खरे म्हणजे 1937-38 मध्येच काँग्रेस पक्षाने भाषावार प्रांतरचनेचे आश्‍वासन दिले होते. पण, स्वातंत्र्यप्राप्‍तीनंतर काँग्रेसने टोपी फिरवली. 1948 मध्ये दार कमिशनचा अहवाल आला. त्यात भाषावार प्रांत रचनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे, तर या अहवालात मराठी लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. 1953 मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने काय निर्णय दिला? मुंबईसह द्वैभाषिक राज्य मराठी जनतेच्या पदरात आले. मराठी भाषिकांवर कडाच कोसळला. मराठी जनता पेटून उठली. मराठी भाषिकांची अस्मिता पणाला लागली. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचे द्वैभाषिक होते. त्यातच मुंबई केंद्रशासित करण्याचाही सूर निघाला. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात अभूतपूर्व आंदोलन उभे राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद डांगे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धव पाटील आदी नेत्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, गव्हाणकर आदींनी आपल्या शाहिरीतून रान उठवले. काँग्रेसविरोधात सारे पक्ष एकवटले. मुंबईत 106 हुतात्मे झाले. द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी सूत्रे घेतली. त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. पण 1957 च्या विधानसभा निवडणुकीत लोकक्षोभ प्रकट झाला. विधानसभेच्या 264 जागा होत्या. त्यापैकी 135 काँग्रेसला मिळाल्या. 129 समितीने जिंकल्या. काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले. मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात काँग्रेसचा धुव्वा उडाला.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

जनतेतील प्रक्षोभ लक्षात घेऊन अखेर काँग्रेसला या प्रश्‍नावर विचार करण्यासाठी समिती नेमावी लागली. त्या समितीने महाराष्ट्र, गुजरात अशी दोन राज्ये करण्याची शिफारस केली. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी यांनीही तसा कौल दिला. पं. नेहरू हे महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यास अनुकूल नव्हते. प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. तेव्हा समितीच्या झेंड्याखाली हजारोंनी शिस्तबद्ध निदर्शने केली. अखेर मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण, या धामधुमीत बेळगाव, कारवार आदी मराठी भाषिक भाग कर्नाटकातच (तेव्हाचे म्हैसूर) अडकला.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण हेच पहिले मुख्यमंत्री झाले. राज्यात विधानसभा मतदारसंघाची रचना करण्यात आली. ही पहिली विधानसभा! दोन वर्षांच्या कालावधीत यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारने पंचायत राज्य स्थापनेसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

Tags: महाराष्ट्र दिवस इतिहासविधानसभा २०१९विधानसभा निवडणूक २०१९विधानसभा निवडणूक इतिहास
Previous Post

पातूर येथील गणपती उत्सव मिरवणूकीचाशांततेत समारोप

Next Post

व्हिडिओ: विसर्जन मिरवणुकीत नागीण डान्स करणे पडले महागात ३० वर्षीय युवकाचा मृत्यु

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
व्हिडिओ: विसर्जन मिरवणुकीत नागीण डान्स करणे पडले महागात ३० वर्षीय युवकाचा मृत्यु

व्हिडिओ: विसर्जन मिरवणुकीत नागीण डान्स करणे पडले महागात ३० वर्षीय युवकाचा मृत्यु

व्हिडिओ: अकोट मतदारसंघातील वानच्या पाण्यासाठी शेतकरी पेटले, हजारो शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

व्हिडिओ: अकोट मतदारसंघातील वानच्या पाण्यासाठी शेतकरी पेटले, हजारो शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

Comments 2

  1. Pingback: आघाडीच्या मतदारसंघाच्या जागेचा तिढा इच्छुक उमेदवार टांगणीला,दोघांचे एकमेकांवर दबावतंत्र - Our Akola
  2. Pingback: तर या दिवशी लागू शकते आचारसंहिता - Our Akola

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.