अकोट (देवानंद खिरकर)- ३७० प्रमाणेच शेतकरी आत्महत्येचे व भारतीय शेतीच्या दुर्दशेचे मूळ शेतकरी विरोधी कायद्यात असून त्याकडे हिवरखेडचे किसानपुत्र अनिल गावंडे यांनी सोमवारी शिवसेना प्रमुखांची भेट घेऊन शेतकऱ्यांना गळफास ठरलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत याकडे त्यांचे लक्ष केंद्रित केले.
शेतकरी विरोधी 3 प्रमुख कायदे
कमाल शेतजमीन धारणा कायदा (सिलिंग), आवश्यक वस्तूंचा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा
शेतकऱ्यांना जीवघेणे ठरलेले हे कायदे जोवर ३७० प्रमाणेच रद्द होत नाहीत. तोवर शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत. शेतकऱ्यांना मारक असलेल्या कायद्यांना रद्द करण्यासठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा व शेती व शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे सूत्रधार व्हावे अशी विनंती अनिल गावंडे यांनी या भेटीत शिवसेना प्रमुखांना केली. याप्रसंगी अनिल गावंडे यांनी प्रकाशित व पुरुषोत्तम अवारे यांनी संपादित “कायदे जेंव्हा जीवघेणे ठरतात” हे पुस्तक भेट देण्यात आले.
या पुस्तकात शेतकरी विरोधी कायदे कोणते व त्यांची व्याप्ती किती याची विस्तृत मांडणी केली आहे. लोकजागर मंच च्या माध्यमातून अनिल गावंडे यांनी शेतकरी विरोधी कायद्याबद्दल जनजागृतीसाठी केलेल्या व्याख्यान, चर्चासत्रे व शिबिरांची यावेळी विस्तृत माहिती दिली.
तसेच ३ वर्षांपासून १९ मार्च १९८६ साली मुलाबाळा सह आत्महत्या केलेल्या व शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद असलेल्या साहेबराव करपे यांचा स्मृतिदिन म्हणून एकदिवस अन्नत्याग आंदोलन केले जात असल्याची माहिती दिली. शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून शिवसेनाप्रमुख यांनी सकरात्मक प्रतिसाद देत लवकरच शेतीतज्ञ यांच्या संवादाचे आयोजन केले आहे. तात्पुरत्या मलमपट्टी ऐवजी मूळ प्रश्नांच्या मुळावर घाव घालून समस्यांचे उच्चाटन करण्याचे कसब असलेल्या अनिल गावंडे या भूमीपुत्राचे शेतकरी वर्गातुन कौतुक होत आहे.
अधिक वाचा : हिवरखेडातील रँचो ने बनवले डवरणी यंत्र, शेतकऱ्यांचा वाचणार वेळ आणि पैसा
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola