अकोट (देवानंद खिरकर )- अकोट तालुक्यातील सावरा विज उपकेंद्राअंतर्गत येणारा गावा मधे गेल्या अनेक दिवसा पासून विजेचा लपंडाव सुरु असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.या संदर्भात संभाजी ब्रिगेड व गावकरी यांनी महावितरन आकोटच्या उप अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे.सावरा फिडर अंतर्गत येणारा सर्व गावा मधे गेल्या कित्येक दिवसा पासून छोट्यासा कारनामुळेही विज पुरवठा खंडीत होन्याचे प्रकार घडत आहेत.त्यामूळे जनजीवन विस्कळीत होवुन सर्व बाबित अडथळे निर्माण होतात.दिवसभर शेतकरी,शेतमजुर शेतात राबराब राबतात.त्यांना रात्रीची निवांत झोप आवश्यक असते.परंतू एन रात्रिच्या वेळी विज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे त्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे सावरा फिडरवर सुरु असलेला विजेचा लपंडाव त्वरित बंद करून नियमित पुरवठा सुरळीत करण्यात यावा.अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर निवेदन देते वेळी संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष ऐडवोकेट संतोष खवले,तालुकाध्यक्ष गोपाल सावरकर,शहर अध्यक्ष पंकज भिसे,राहुल जायले,नितीन चिंचोळकर,निखिल पुंडकर,किशोर रोकडे,वैभव पुनसे,प्रवीण मेंढे,सुरज मेंढे,मुरलीधर मेंढे,अविनाश मेंढे,जयेश गावंडे,सव्प्नील गावंडे,गोलु गावंडे,कपिल गावंडे,गोपाल गहले,धम्मपाल धुन्दे,स्वराज कुलट,अंकित कुलट,रुशि कुलट,श्याम कुलट,सौरभ गावंडे,शुभम कुलट,विलास सावरकर,अक्षय गायकवाड,निलेश साबळे,प्रशांत साबळे,सागर गडंम,आकाश कस्तुरे,विशाल मामनकर,यांच्या सह सावरा फिडर मधे येणारा गावामधिक तरून उपस्थित होते.