तेल्हारा (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या लोकसभांच्या निवडणुकी मधील ई.व्ही. एम मशिनान मधील मतदानाची झालेली तफावत पाहाता झालेल्या निवडणुका रद्द करून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका ह्या ब्यालेट पेपरवरच व्हाव्यात यासाठी आज तहसील कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तब्बल चार तास घंटानाद करण्यात आले
महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या मतदानामध्ये एकुण झालेले मतदान व ई.व्ही एम मधील मतदानाचे आकडे यामधे प्रचंड तफावत आहे. 48 मतदार संघापैकी 26 मतदार संघात एकुण उमेदवारांच्या झालेल्या मतदानाच्या कमी मतदान आहे तर 22 मतदान संघात ई.व्ही एम मधे एकुण उमेदवारांच्या मतदानापेक्षा जास्त मते दिसली त्यामुळे या मतदान प्रक्रिये वरून मतदारांचा विश्वास उडाला आहे म्हणून निवडणुक आयोगाने आपल्याला असलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्रातील सर्वच 48 लोकसभा मतदार संघातील झालेल्या निवडणुका नव्याने बॅलेट पेपरवर घ्याव्यात व यापुढे महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरच व्हाव्यात अश्या मागणीचे पत्र यावेळी तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी घंटानाद आंदोलनात भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्तित होते.