अकोला(प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या ईपीएस ९५ पेंशनाराच्या पेंशन वाढी बाबतचा एन.डी.ए. मोदि सरकारच्या नकारात्मक धोरणाचा निषेध करण्यासाठी ईपीएस ९५ पेंशनरांची विभागीय सभा स्वराज्य भवन अकोला येथे पेंशनरांच्या प्रचंड उपस्थित पार पडली. इपीएस ९५ पेंशन धारक संघर्ष समीतीचे सचीव कॉ. रमेश गायकवाड हे सभेला प्रास्तावीक भाषन संबोधीत करताना म्हणाले की, आम्ही सन २०१४ हे सरकार सत्तेत येण्या पुर्वी पासुन नंतर लोकसभेत व रस्तावर सन २०१४ ते २०१९ पर्यंत हे सरकार कामगर विरोधी शेतकरी जनता विरोधी आहे असे सांगत आहो आणी सांगत राहणार . एन.डी.ए. मोदी सरकार सत्तेत आल्यावर खासदारांचे पगार व पेंशन या मध्ये प्रचंड प्रमानात वाढ करु शकते, ज्यांचा विकासाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन सरकारी तिजोरीतुन खीरापत वाटण्याचा सपाटा चालविला आहे. मात्र ज्याचा खरोखर देशाच्या विकासात महत्वाचा वाटा उचलुन आपल्या वृध्दत्वाची व्यवस्था आपल्या पगारातुन करुन ठेवली त्यांना वृध्दपकाळात भिका-यांचे जिवन जगण्यास सरकार भाग पाडीत आहे व त्याच्याच पैसा त्यांना देण्यास नकार देत आहे. या नकारात्मक धोरणाचा निषेध आम्ही करित आहो आणि करित राहणार यानंतर कॉ. श्रीनिवास गणगणे, कॉ. एम.टी.इंगळे, कॉ. सुभाष राठोड, उत्तमराव काळे, रामराव पाटखेडे, यांचे भाषणा भगतसिंह कोशीयारी अहवाला नुसार पेंशन व त्यावर महागाई भत्ता दिला नाही तर नो कोशीयारी नो भाजपा वोट चा संदेश उपस्थितांनी आप आपल्या नगरात, शहरात, गावात देण्यात यावा.
या नंतर सभेचे अध्यक्ष कॉ. देवराव पाटील यांनी आपल्या भाषनातुन केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडुन टिका करत सांगितले की ९० दिवसात कोशीयारी समीतीच्या शिफारसी प्रमाणे ३०००/- पेंशन व महागाई भत्ता देण्याचे आश्वासन प्रकाश जावडेकर यांनी सत्तेत येण्या पुर्वी दिले होते पंरतु ९०० दिवस होवुनही पेंशन वाढी बाबत अद्यापही कोणतेही पाऊल उचलले नाही. ४ जानेवारी २०१९ ला लोकसभेत खा. प्रेमचंद्र यांचे प्रश्नाचे उत्तरात पेंशन वाढी बाबत सरकार सकारात्मक असुन फेब्रुवारी २०१९ होणा-या सी.बी.टी. च्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट उत्तर मा. संतोष गंगावार यांनी दिले होते. त्यावर विश्वास ठेवुन सर्व ६२ लाख पेंशनर फार मोठ्या अपेक्षेने पाहत होते. दि. २१.०२.२०१९ रोजीच्या ईपीएस ९५ विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पेंशन वाढीचा प्रश्न पुढील बैठकी पर्यंत लांबनिवर टाकण्यात आला हि भुमिका केंद्र सरकाची पेंशनर यांचे सोबत स्पष्ट दगाबाजी आहे. याचा तिव्र शब्दात निषेध करुन दगाबाजी करण्या-यांना येत्या निवडणुकीत त्यांचा हिशोब नो कोशीयारी नो भाजपा को वोट हा नारा देवुन भाजपा सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी पेंशनर आपली ताकत दाखवुन देतील असा इशारा कॉ. देवराव पाटील यांनी दिला शेवटी आचार सहिंता लागण्यापुर्वी कोशीयारी समीतीची पुर्तता केंद्र सरकारने करावी असा निर्वानिचा ईशारा या वेळी देण्यात आला. अन्यथा भाजपाच्या मतावर परीनाम होण्या साठी तयार रहा. संचालन कॉ. राजेंद्र भातुलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉ. नयन गायकवाड यांनी केले या विभागीय सभेला अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशीम व यवतमाळ येथुन मोठ्या संख्येने पेंशनर उपस्थीत होते.