श्रीनगर : पाकिस्तानची तीन विमाने आज, बुधवारी (दि.२७) जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसली. मात्र, भारतीय हवाई दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने पाकिस्तानची विमाने पिटाळून लावण्यात यश आले आहे.
सीमारेषेचे उल्लंघन करत पाकिस्तानने आपली विमाने घुसवली आहेत. यावेळी भारतीय हद्दीत पाकिस्तानी विमानांनी बॉम्ब टाकले असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसल्यानंतर त्यांना हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, परत जात असतानाही पाकिस्तानी विमानांनी बॉम्ब फेकले आहेत. या घटनेमुळे कोणत्याही प्रकारची जीवित अथवा अन्य कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमधील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाचे विमान बडगाम जिल्ह्यात कोसळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर, जम्मू आणि लेह विमानतळावरून नागरी विमान उड्डाणं वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीच्या पार्श्वभूमीवर या तीन विमानतळावरील वाहतूक तूर्त बंद ठेवण्यात आली असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने तिन्ही दल प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे.
अधिक वाचा : पुलवामाचे उत्तर : भारताने पीओकेमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर केला 1000 किलो बॉम्बचा हल्ला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola