अकाेला(प्रतिनिधी)- कृषी क्षेत्रातील प्रश्नांवर शेतकरी जागर मंचातर्फे दुसरी कासाेधा परिषद (कापूस-सोयाबीन-धान) २३ अाॅक्टाेबरला स्वराज्य भवन येथे हाेणार अाहे. या परिषदेत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेते सहभागी हाेणार अाहेत. या परिषदेनंतर पुकारण्यात येणाऱ्या अांदाेलनातही हे नेते उपस्थित सहभागी हाेणार अाहेत. परिषदेच्या नियाेजनासाठी शनिवारी जि. प विश्रामगृह येथे सामाजिक संघटना, राजकीय पक्षांची बैठक पार पडली. शेतीच्या प्रश्नांवर बैठकीत उपस्थितांनी एल्गार पुकारण्याचा निर्धार केला. परिषदेच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक तालुकास्तरावर बैठका घेेणार, असून त्यानंतर किमान २० गावांत बैठका घेणार अाहे. बैठकांच्या सत्राला रविवारी प्रारंभही झाला.
निसर्गाचा लहरीपणा, शासनाचे चुकीचे धाेरण, लालफितशाहीच्या कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस अाले अाहेत. याच पृष्ठभूमीवर गत वर्षापासून येथे कासाेधा परिषद अायाेजित करण्यात येत अाहे. यंदा या परिषदेच्या नियाेजासाठी शनिवारी बैठक झाली. बैठकीला सामाजिक व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित हाेते. यात रामा उंबरकार, अादित्य दामले, संताेष हुसे, डाॅ. झिशान हुसेन, प्रशांत भटकर, कपिल ढाेके, प्रदीप चाेरे, नीलेश ठाेकळ, दत्ता पाकधुने, प्रदीप वखारीया, डाॅ. विजय जाधव, दिलीप लाेढम, विपुल घाेगरेंसह शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, मनाेज तायडे, विजय देशमुख, शिवाजी म्हैसने, सै. वासिफ, ज्ञानेश्वर गावंडे,ज्ञानेश्वर सुलताने, दिलीप माेहाेड, राजू मंगळे अादींचा समावेश हाेता. परिषदेत महाराष्ट्र युवा परिषद सक्रिय सहभाग नाेंदवणार असून, २० तारखेपासून ५०० युवक अकाेल्यात येणार अाहे. हे युवक अनेक गावांमध्ये जनजागृती करणार अाहेत.
गतवर्षी ३ ते ६ डिसेंबर दरम्यान कासाेधा परिषदेच्या निमित्ताने अांदाेलन केले हाेते. यंदा हाेणाऱ्या परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून खा. शत्रुघ्न िसन्हा, यशवंत सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. कुमार केतकर, खा. दिनेश त्रिवेदी, खा. संजय सिंह, अामदार बच्चू कडू, आशिष देशमुख, शंकर अण्णा धाेंडगे, रविकांत तुपकर अादी उपस्थित राहणार अाहेत.
गतवर्षीही विविध मुद्यांवर माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात पोलिस मुख्यालयात अांदाेलन केले हाेते. अांदाेलनानंतर संघटनांनी पाठिंबा दिला हाेता. मात्र अाता अांदाेलनापूर्वीच नियोजनापासूनच संघटनांच्या भेटी घेण्यात येत असून, त्यांच्याशी चर्चा करुनच पुढील दिशा निश्चित केली. यंदा २३ अाॅक्टाेबरनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढणार असून, त्यानंतरच तेथेच अांदाेलनाचे िचत्र स्पष्ट हाेणार अाहे.
कासाेधा परिषदेच्या पृष्ठभूमीवर रविवारी देगाव येथे बैठक झाली. या बैठकीत खिरपुरी, नांदखेड टाकळी, बटवाडी, व्याळा येथील ग्रामस्थ सहभागी झाले हाेते. साेमवारी दुपारी पातूर, संध्याकाळी बाळापूर तालुक्याची बैठक हाेणार अाहे. मंगळवारी मूर्तिजापूर व बार्शीटाकळी, बुधवारी अकाेट व तेल्हारा येथे बैठक हाेणार अाहे.
अाॅक्टाेबरमध्ये पुढील मुद्द्यांवर जनअांदाेलन उभारणार अाहे. शेतमालासाठी भावांतर याेजना लागू करावी. नागपूर खंडपीठाच्या अादेशानुसार दुष्काळी अनुदान (प्रती हे. ६८००) रुपये त्वरित देण्यात यावेत. साेने तारण कर्जमाफी योजनेतील अटी दूर करुन लागू करावी. शेतकऱ्यांना न मिळालेला ऑफलाइन पीक विमा देण्यात यावा. शेतकऱ्यांना किमान एकरी ५० हजाराचे पीक कर्ज मिळावे. ट्रॅक्टर व इतर शेती अवजारांसाठी ४ टक्के दराने कर्ज असावे. गतवर्षी जाहीर झालेले तूर, हरभऱ्याचे अनुदान त्वरित देण्यात यावे. वन्य प्राण्यांपासून हाेणाऱ्या शेतमालाच्या नुकसानाची भरपाई द्यावी. जिल्हयातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावेत.
अधिक वाचा : अकोल्यातील ‘आरटीओ’ कार्यालयाचे होणार स्थानांतरण आ. बाजोरियांचा पुढाकार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola