• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 0
0
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :- पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या समस्या निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज सोमवार दि. 17 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 252 तक्रारी प्राप्त झाल्या. विशेष म्हणजे स्वत: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन तक्रार घेऊन आलेल्या उपस्थित नागरिकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसांच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही तक्रारकर्त्याना दिला.

जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबध्द असून पिक विमा, कर्ज प्रकरणं याबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू दिली जाणार नाही. या बाबींचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत, असे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले.

यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदनं जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व इतर अधिका-यांसोबत स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली, याबाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्या. जनतेच्या तक्रारींचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.



मागील सभेत प्राप्त झालेल्या जुन्या तक्रारींचा विभागवार आढावा यावेळी घेण्यात. यात महसुल, जिल्हा परिषद, मनपा, पोलीस विभाग, महावितरण, कृषी, सहकार आदी विभागाचा समावेश हेाता. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीत विभागाच्या तक्रारकर्त्यांचा नावाचा पुकारा केल्यानंतर प्रत्यक्ष संबधीत विभागाच्या अधिका-यांसमोर समक्ष तक्रार कर्त्यांची तक्रार जाणून घेवून या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते, तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिकाऱ्यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.

आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 252 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.

विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग – 98 तक्रारी, पोलीस विभाग— 20, जिल्हा परिषद- 54, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था – 14, महानगर पालिका – 04, अग्रणी बँक – -03, विद्युत विभाग – -09, भूमी अभिलेख – -05, कृषी विभाग – 20, सार्वजनिक बांधकाम विभाग – 04, , जिल्हा शल्य चिकित्सक– 07, दुय्यम निबंधक –03, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण-01, उपवनसंरक्षक-01, एकात्मिक आदिवासी विकास-01, सहायक आयुक्त धर्मदाय-01, कुलसचिव, पीकेव्ही-01, सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन-01, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क-01, जिल्हा ग्रंथालय-01, कौशल्य विकास व रोजगार विभाग-01, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय-01, एमआयडीसी-01 अशा एकुण 252 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.

अधिक वाचा : अकोला जिल्हाधिकारी कार्यालया वर चर्मकार समाजाने काढला धडक मोर्चा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Dr. Ranjit Patil
Previous Post

मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्यात्या नराधमाला फाशीची मागणी

Next Post

अखेर लेंडी नाल्याचा तो पुल कोसळलाच…

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
हिवरखेड

अखेर लेंडी नाल्याचा तो पुल कोसळलाच...

Asia Cup 2018: भारताची आज हाँगकाँगशी लढत

Asia Cup 2018: भारताची आज हाँगकाँगशी लढत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.