• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, October 29, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली

Our Media by Our Media
July 21, 2025
in Featured, अकोला, ठळक बातम्या, विदर्भ
Reading Time: 1 min read
77 1
0
तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांचे प्रबोधन केले. समाज परिवर्तन केले. राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी राष्ट्रभक्ती रुजवण्याचे काम केले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले. त्याचवेळी महाराजांचे विचार सर्वव्यापी करण्यासाठी, नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भास्तरीय खंजारी भजन स्पर्धेचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर प.पू. जितेंद्रनाथ महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री. जनार्दनपंत बोथे गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत काळमेघ, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अशोक यावले, संताजी सभागृहाचे अध्यक्ष नानाभाऊ ढगे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

भजने मनोरंजनासाठी नाहीत, समाजावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आहेत. महाराजांच्या भजनांमध्ये हा भाव आपल्याला बघायला मिळतो, याचाही ना. श्री. गडकरी यांनी उल्लेख केला. ग्रामविकास ही ग्रामगीतेची संकल्पना आहे. ग्रामीण भागाचा विकास कसा व्हायला हवा, आदर्श गाव कसे असावे हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितले. पण हा विचार शब्दांपुरता मर्यादित न राहता आपल्याला कृतीमध्ये उतरवावा लागेल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. महाराजांनी त्यांच्या जीवनात कृषी विकास, स्वच्छता आदींचा विचार पोहोचवला. त्यांच्या गीतांनी, भाजनांनी आपण भारतीय आहोत, ही भावना रुजविण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.

खासदार सांस्कृतिक महोत्सवात 4000 गुरुदेव भक्तांनी भजन गावे अशी इच्छा ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रसंतांचे विद्यापीठ गीत 50 हजार विद्यार्थ्यांनी एकावेळी गावे आणि विश्वविक्रम करावा, अशी इच्छा असल्याचेही ते म्हणाले. समाजपरिवर्तनाचे प्रक्रिया गतिशील करण्यासाठी राष्ट्रसंतांच्या विचारांचा अधिक प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे ना. श्री. गडकरी म्हणाले. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले. तर आभार डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी मानले. श्याम देशपांडे, देवेंद्र यादव, स्नेहल पाळवीकर, विजयराव बोरीकर, उमेश बारापात्रे, फाल्गुन खुर्जेकर, शुभांगी नाफड, रश्मी किन्हीकर, वैकुंठ उज्जैनकर, कृष्णा डोमके यांनी तीन दिवस झालेल्या स्पर्धेचे परीक्षण केले. ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

भजन हे आत्म्याचे भोजन व्हावे – जनार्दनपंत बोथे गुरुजी

‘तुकडोजी महाराज बरेचदा रेल्वेच्या प्रवासात भजन लिहायचे. महाराजांनी भजनांचे वैभव आपल्याला दिले. भजन हे खऱ्या अर्थाने आत्म्याचे भोजन व्हायला पाहिजे. म्हणूनच साधू संतांनी हे साहित्य लिहून ठेवले आहे,’ असे जनार्दनपंत बोथे गुरुजी म्हणाले.

गुरुदेवांसारखे संत लाभले हे विदर्भाचे भाग्य – प.पू. जितेंद्रनाथ महाराज

भजने पौरुष, आदर्श, प्रेरणा निर्माण करण्याचे काम करतात. या भजनांच्या माध्यमातून मनाच्या, भावनांच्या लहरी कशा असाव्यात हे राष्ट्र संतांनी लिहून ठेवले. भारत एक मंदिर आहे असं महाराजांनी म्हटलं आहे. त्यामुळे गुरुदेवांसारखे संत लाभले हे विदर्भाचे भाग्य आहे, असे श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर प.पू. जितेंद्रनाथ महाराज म्हणाले. गडकरी हे गुरुदेवांचे प्रचारक म्हणून खऱ्या अर्थाने देशाची सेवा करीत आहेत. त्यांना गुरूदेवांचा आशीर्वाद आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

स्पर्धेचा निकाल

  • प्रथम क्रमांक – स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरी (1 लाख रुपये)
  • दुसरा क्रमांक – आदर्श गुरुदेव सेवा मंडळ निमगव्हाण चांदूर रेल्वे (71 हजार रुपये)
  • तिसरा क्रमांक – सार्थक गुरुदेव सेवा मंडळ हस्तापूर बाभुळगाव ( 51 हजार रुपये)
  • चौथा क्रमांक – गुरुदेव मानवसेवा छात्रालय भजन मंडळ, मोझरी (41 हजार रुपये)
  • पाचवा क्रमांक – अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ हिरापूर बोथली चंद्रपूर (31 हजार रुपये)
  • सहावा क्रमांक – जय वळेकर माऊली भजन मंडळ खामगाव (21 हजार रुपये)
  • सातवा क्रमांक – गुरुमाऊली भजन मंडळ साहूर आष्टी (11 हजार रुपये)
उत्तेजनार्थ पुरस्कार

गोपाल प्रासादिक मंडळ साकोली, नक्षत्र कला मंदिर नागपूर, गुरुमाऊली भजन मंडळ नागपूर, गुरुदेव भजन मंडळ नागपूर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गिरड, रत्नाक्षी भजन मंडळ नागपूर, नवयुवक भजन मंडळ कळमेश्वर, गुरुदेव सेवा भजन मंडळ जयताळा नागपूर, गुरुदेव सेवा प्रार्थना मंडळ नवे बीडीपेठ नागपूर, गुरुदेव सेवा भजन मंडळ अर्जुनी मोरगाव, गुरुदेव बाल सेवा मंडळ समुद्रपूर गिरड, ग्रामनाथ सेवा भजन मंडळ राळेगाव, जय बजरंग गुरुदेव भजन मंडळ दहेगाव रंगारी आणि साईकृपा भजन मंडळ म्हाळगी नगर नागपूर यांना 5 हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.

271 मंडळांनी केला राष्ट्रसंतांच्या भजनांचा जागर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांवर आधारीत विदर्भस्तरीय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सलग दोन दिवस 271 भजन मंडळानी सहभाग नोंदवला. त्यातील 21 मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपरिक चालींवर आधारित प्रबोधनात्मक व राष्ट्रभक्तीवर आधारित विषयांवरची भजनं यावेळी मंडळांनी सादर केली. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्याबाहेरील सहभागी मंडळांना 4000 रुपये व नागपूर शहरातील सहभागी मंडळांना 2000 रुपये मानधन देण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक व अशोक यावले, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता, उपाध्यक्ष गौरीशंकर पाराशर व माजी आमदार अशोक मानकर, कोषाध्यक्ष राजेश बागडी, बाळासाहेब कुळकर्णी, दीपक खिरवडकर, अविनाश घुशे, विजय फडणवीस, राजेश कुंभलकर, मनिषा काशीकर, किशोर पाटील, भोलानाथ सहारे, श्रीरंग वराडपांडे, दिलीप जाधव, शशांक खेकरे आदी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Previous Post

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

Next Post

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Next Post
बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.